शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

आढावा सभेत तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:25 IST

गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली.

ठळक मुद्देवणीत पहिल्यांदाच आयोजन : एसपींसह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतवणी : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली. या सभेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. चार तास चाललेल्या या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.तक्रारींची संख्या लक्षात घेता शासनाच्या विविध विभागांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लाागले आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता आढावा सभेला प्रारंभ झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी दीपक सिंगला, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती लिशा विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. या आढावा सभेला तालुक्यातील अनेक गावातील सरपंच व नागरिकांनी हजेरी लावली. तसेच स्थानिक विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना.अहीर यांनी विभागवार प्रगतीचा व तक्रारींचा आढावा घेतला. बहुतेक सरपंचांनी गावातील पाणी टंचाईचा विषय आढावा सभेत मांडला. यात वांजरी, गोवारी, नांदेपेरा, कुरई, शिंदोला, राजूर कॉलरी, कुंभारखणी, शिरपूर या गावांसह अनेक गावातील पाणी टंचाईची तिव्रता मंत्र्यांपुढे मांडली. शासनाने विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक पोर्टल सुरू केले असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी यावेळी दिली. वणी तालुक्यातील एसीसी कंपनी व वेकोलिकडून प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावकºयांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच नागरिकांनी वाचला. त्यावर संबंधित गावचे सरपंच व एसीसी, वेकोलिचे अधिकारी यांची उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देण्यासाठी बँक टाळाटाळ करीत असल्याची बाब पुढे आली. त्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांना ना.अहीरांनी चांगलेच खडसावले.राजूर कॉलरी येथील पाणी पुरवठा योजनेत अपहार होत असल्याची तक्रार सरपंचांनी केली. याची चौकशी करण्याचे आदेश वेकोलि अधिकाऱ्यांना देण्यात आले. अनेक गावातील सरपंचांनी अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार केली. त्यावर दारू विक्री करणाऱ्यांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अहीर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.राजेश कुळकर्णी यांनी उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजनांबाबत माहिती दिली. बीटी बियाणे फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी कृषी अधिकारी अकारण बियाणांचे वेष्टन मागत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या. त्यावर ना.अहीरांनी कृषी अधिकाऱ्यांना शासनाचे परीपत्रकच दाखविले व केवळ बिलाच्या आधारे तक्रारी घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत वीज वितरण कंपनी, एस.टी. महामंडळ, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागातील समस्यांचाही आढावा घेण्यात आला.