शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आढावा सभेत तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:25 IST

गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली.

ठळक मुद्देवणीत पहिल्यांदाच आयोजन : एसपींसह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतवणी : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली. या सभेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. चार तास चाललेल्या या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.तक्रारींची संख्या लक्षात घेता शासनाच्या विविध विभागांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लाागले आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता आढावा सभेला प्रारंभ झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी दीपक सिंगला, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती लिशा विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. या आढावा सभेला तालुक्यातील अनेक गावातील सरपंच व नागरिकांनी हजेरी लावली. तसेच स्थानिक विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना.अहीर यांनी विभागवार प्रगतीचा व तक्रारींचा आढावा घेतला. बहुतेक सरपंचांनी गावातील पाणी टंचाईचा विषय आढावा सभेत मांडला. यात वांजरी, गोवारी, नांदेपेरा, कुरई, शिंदोला, राजूर कॉलरी, कुंभारखणी, शिरपूर या गावांसह अनेक गावातील पाणी टंचाईची तिव्रता मंत्र्यांपुढे मांडली. शासनाने विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक पोर्टल सुरू केले असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी यावेळी दिली. वणी तालुक्यातील एसीसी कंपनी व वेकोलिकडून प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावकºयांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच नागरिकांनी वाचला. त्यावर संबंधित गावचे सरपंच व एसीसी, वेकोलिचे अधिकारी यांची उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देण्यासाठी बँक टाळाटाळ करीत असल्याची बाब पुढे आली. त्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांना ना.अहीरांनी चांगलेच खडसावले.राजूर कॉलरी येथील पाणी पुरवठा योजनेत अपहार होत असल्याची तक्रार सरपंचांनी केली. याची चौकशी करण्याचे आदेश वेकोलि अधिकाऱ्यांना देण्यात आले. अनेक गावातील सरपंचांनी अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार केली. त्यावर दारू विक्री करणाऱ्यांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अहीर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.राजेश कुळकर्णी यांनी उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजनांबाबत माहिती दिली. बीटी बियाणे फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी कृषी अधिकारी अकारण बियाणांचे वेष्टन मागत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या. त्यावर ना.अहीरांनी कृषी अधिकाऱ्यांना शासनाचे परीपत्रकच दाखविले व केवळ बिलाच्या आधारे तक्रारी घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत वीज वितरण कंपनी, एस.टी. महामंडळ, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागातील समस्यांचाही आढावा घेण्यात आला.