शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तक्रारींचा मारा व जागीच निपटारा

By admin | Updated: April 25, 2017 01:08 IST

पैसे भरले पण कनेक्शन दिले नाही... शासकीय जागेत अनधिकृत वीजपुरवठा दिला...

उर्जामंत्र्यांचा जनता दरबार : आर्णी, पुसद, घाटंजी तालुक्यातील तक्रारी सर्वाधिक यवतमाळ : पैसे भरले पण कनेक्शन दिले नाही... शासकीय जागेत अनधिकृत वीजपुरवठा दिला...डीपी बदलवून द्या... महावितरणच्या कारभाराची पोलखोल करणाऱ्या तक्रारींचा पाऊसच सोमवारी थेट उर्जामंत्र्यांपुढे कोसळला. पण उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आली तक्रार लगाव अधिकाऱ्यांना फटकार, अशा शैलीत प्रत्येक तक्रारीचा जागच्या जागी निपटारा करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी गाऱ्हाणे मांडत होते अन् मंत्र्यांचे प्रश्न दोषी अधिकाऱ्यांचा थरकाप उडवित होते. सोमवारी यवतमाळात पार पडलेल्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारातील हे चित्र ग्राहकांना सुखावणारे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना कामास लावणारे होते. ना. बावनकुळे यांच्या हस्ते विविध वीज उपकेंद्रांचे लोकार्पण झाल्यानंतर येथील महावितरणच्या कार्यालयात लगेच जनता दरबाराला सुरूवात झाली. एकंदर २३ तक्रारी जनता दरबारासाठी आधीच नोंदविण्यात आल्या होत्या. मात्र, दरबार जसा सुरू झाला, तसतशा तक्रारी वाढत तक्रारींची संख्या शंभरावर पोहोचली.निश्चल येरावार यांनी ढाणकी येथे वीज उपकेंद्राची मागणी करताच मंत्र्यांनी लगेच मंजुरी देऊन टाकली. बोरीअरब (ता. दारव्हा) येथे अनियमित वीज पुरवठा होत असल्याची तक्रार हरीश लढ्ढा या शेतकऱ्याने केली. तर अंजनखेड (ता. आर्णी) येथील सुशील नाननवरे यांनी पैसे भरूनही आपल्याला कनेक्शन मिळाले नसल्याची तक्रार केली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच कनेक्शन दिल्याचे सांगितले. मात्र, माझा जनता दरबार होता म्हणून तातडीने काम केले का? असा सणसणीत सवाल विचारत उर्जामंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना घाम फोडला. तक्रार येण्याची वाट न पाहाता अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्याचा आदेश उर्जामंत्र्यांनी दिला. देऊरवाडीचे किसन ठाकरे, बी. पी. पेंदोर, पी. के. इंगळे, दारव्हाचे गुणवंत गुल्हाने, महागावचे डी. के. नाईक, यवतमाळचे अजाब तंबाखे, अंबोडाचे आनंदराव पतंगराव, पुसदचे भरत पाटील, यवतमाळच्या मधुबन सोसायटीतील कल्पना तारे, महागावचे पंडितराव देशमुख, आर्णीचे दत्तात्रय देशमुख, सुकळीचे वैकुंठ मुंडे, दिलीप मडावी, शोभा बोबडे, नरेंद्र बोबडे, किशोर माळी, तळणीच्या नलिनी वाघमारे, श्यामराव कवाने, वडगावचे वाल्मिक पुनवटकर, नेरचे रमेश देशमुख आदींनी कृषी जोडण्या आणि घरगुती जोडण्यांच्या संदर्भात तक्रारी दाखल केल्या. तर मुळावा येथील जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी मरसूळ येथील उपकेंद्राची सुरूवात करण्याची मागणी केली. शिवसेनेतर्फे दारव्हा येथे महावितरणचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मनसेतर्फे विविध कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करण्यात आली. अविनाश उधनकर या तरुणाला २००९ पासून अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी टाळाटाळ सुरू असल्याची बाब पुढे येताच उर्जामंत्र्यांनी त्याचे कागदपत्र मागवून तत्काळ नोकरीचा प्रश्न सोडविला. या शिवाय, विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे बापू दर्यापूरकर, नांझा ग्रांपचायत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, वीज तारतंत्री संघटना आदींच्याही तक्रारी मांडण्यात आल्या. तसेच महावितरणचे अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याच्या दोन निनावी तक्रारीही उर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचल्या.यावेळी महावितरण नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे, महापारेषणचे प्रकल्प संचालक रवींद्र चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, पारेषणचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत, अधीक्षक अभियंता विजय भटकर, अनिल वाकोडे, अविनाश कसबेकर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)वीज अभियंत्यांना धरले मंत्र्यांनी धारेवर जनता दरबारातील तक्रारींचा खच पाहून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. या सर्व तक्रारींची निट वर्गवारी करा. येत्या १५ दिवसांत त्या सोडवा. तसेच जी कामे झाली, असे अधिकाऱ्यांनी दरबारात सांगितले, त्या कामांचे फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवा, असे आदेश ना. बावनकुळे यांनी दिले. जिल्ह्यातील कामांची तपासणी करण्यासाठी ‘स्पेशल व्हिजिलन्स’ येणार असल्याचेही ते म्हणाले. ट्रान्सफार्मर बदलताना ते नेण्या-आणण्याचा खर्च शेतकऱ्यांकडून घेऊ नका, शेतातील पोल सरळ करण्यासाठी ५ कोटींचा प्रस्ताव द्या, कॅपॅसिटर बँक तयार करा, जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची यादी तीन दिवसात द्या, अशा आदेशांची सरबत्ती करून उर्जामंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.एक्साईज अधिकाऱ्यांनो ! हप्तेखोरी बंद करा, अन्यथा नोकरी सोडाराज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातही जनता दरबार घेतला. जिल्ह्यातल बहुतांश दारू विक्रेत्यांनी यावेळी आपली दुकाने वाचविण्यासाठी निवेदने दिली. ही निवेदने त्या-त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे देऊन काही मार्ग निघेल का, याचा अंदाज घेण्यात येणार असल्याचे ना. बावनकुळे म्हणाले. तसेच आता गावागावातील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रक्षक दल स्थापन करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्कचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अजूनही लिफाफे पद्धत सुरूच ठेवली आहे. आता ही हप्तेखोरी बंद न झाल्यास नोकरी सोडावी लागेल, असा इशाराही ना. बावनकुळे यांनी दिला. यावेळी पालकमंत्री मदन येरावार, उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर उपस्थित होते.मुख्यालयी न राहिल्यास घरभाडे भत्ता बंद करणार अंजी नृ. येथील शेतकऱ्यांनी लाईनमन, अभियंता मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर उर्जामंत्र्यांनी घाटंजी येथील वीज कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तेथील शाखा अभियंता, उपअभियंता मुख्यालयी राहात नसतील तर त्यांचा एचआरए बंद करा, असा आदेश दिला. त्याचवेळी जेई गोलाईत यांच्या तीन तर जेई गजभिये यांच्या दोन वेतनवाढी रोखण्याचे आदेशही उर्जामंत्र्यांनी दिले.