शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३७ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:24 IST

गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.

ठळक मुद्देजलप्रकल्पात २२ टक्के साठा : अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.यावर्षी मे महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाची चाहूल लागताच जिल्हावासीयांना यावर्षी चांगला पाऊस कोसळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. प्रत्यक्षात रोहिणी आणि मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने हजेरी लावलीच नाही. जून महिन्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकरी संकटात सापडले. जलप्रकल्पही जेमतेम २२ टक्केच भरले. आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३७ टक्के पाऊस झाल्याने पुन्हा सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे.कमी पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प निम्मेही भरले नाहीत. सध्या मोठ्या पूस प्रकल्पात १६.९७ टक्केच पाणीसाठा आहे. अरूणावती प्रकल्पात २१.५८, बेंबळा २६.८१, अडाण २९.०६, नवरगाव २३.१६, गोकी १०.५८, वाघाडी १७.२२, सायखेडा ३५.१४, अधरपूस ४५.७३, तर बोरगाव प्रकल्पत केवळ १.३६ टक्के जलसाठा आहे.गतवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये ३० टक्के जलसाठा होता. यावर्षी तो २२ टक्केवरच आला. यामुळे जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील नक्षात चांगला पाऊस झाल्यास जलप्रकल्प भरतील. अन्यथा जिल्हा पुन्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.वणी, झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानजिल्ह्यातील जलप्रकल्पाची पावसाची प्रतीक्षा असताना गेल्या २४ तासांत वणी आणि झरी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली. या दोन्ही तालुक्यात सोमवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा, विदर्भा आदी नदींसह सर्वच नाले दुथडी भरून वाहात आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज