शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
4
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
5
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
6
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
7
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
8
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
9
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
10
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
11
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
12
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
14
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
15
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
16
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
17
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
18
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
19
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
20
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३७ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:24 IST

गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.

ठळक मुद्देजलप्रकल्पात २२ टक्के साठा : अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.यावर्षी मे महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाची चाहूल लागताच जिल्हावासीयांना यावर्षी चांगला पाऊस कोसळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. प्रत्यक्षात रोहिणी आणि मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने हजेरी लावलीच नाही. जून महिन्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकरी संकटात सापडले. जलप्रकल्पही जेमतेम २२ टक्केच भरले. आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३७ टक्के पाऊस झाल्याने पुन्हा सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे.कमी पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प निम्मेही भरले नाहीत. सध्या मोठ्या पूस प्रकल्पात १६.९७ टक्केच पाणीसाठा आहे. अरूणावती प्रकल्पात २१.५८, बेंबळा २६.८१, अडाण २९.०६, नवरगाव २३.१६, गोकी १०.५८, वाघाडी १७.२२, सायखेडा ३५.१४, अधरपूस ४५.७३, तर बोरगाव प्रकल्पत केवळ १.३६ टक्के जलसाठा आहे.गतवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये ३० टक्के जलसाठा होता. यावर्षी तो २२ टक्केवरच आला. यामुळे जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील नक्षात चांगला पाऊस झाल्यास जलप्रकल्प भरतील. अन्यथा जिल्हा पुन्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.वणी, झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानजिल्ह्यातील जलप्रकल्पाची पावसाची प्रतीक्षा असताना गेल्या २४ तासांत वणी आणि झरी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली. या दोन्ही तालुक्यात सोमवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा, विदर्भा आदी नदींसह सर्वच नाले दुथडी भरून वाहात आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज