शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३७ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:24 IST

गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.

ठळक मुद्देजलप्रकल्पात २२ टक्के साठा : अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.यावर्षी मे महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाची चाहूल लागताच जिल्हावासीयांना यावर्षी चांगला पाऊस कोसळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. प्रत्यक्षात रोहिणी आणि मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने हजेरी लावलीच नाही. जून महिन्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकरी संकटात सापडले. जलप्रकल्पही जेमतेम २२ टक्केच भरले. आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३७ टक्के पाऊस झाल्याने पुन्हा सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे.कमी पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प निम्मेही भरले नाहीत. सध्या मोठ्या पूस प्रकल्पात १६.९७ टक्केच पाणीसाठा आहे. अरूणावती प्रकल्पात २१.५८, बेंबळा २६.८१, अडाण २९.०६, नवरगाव २३.१६, गोकी १०.५८, वाघाडी १७.२२, सायखेडा ३५.१४, अधरपूस ४५.७३, तर बोरगाव प्रकल्पत केवळ १.३६ टक्के जलसाठा आहे.गतवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये ३० टक्के जलसाठा होता. यावर्षी तो २२ टक्केवरच आला. यामुळे जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील नक्षात चांगला पाऊस झाल्यास जलप्रकल्प भरतील. अन्यथा जिल्हा पुन्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.वणी, झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानजिल्ह्यातील जलप्रकल्पाची पावसाची प्रतीक्षा असताना गेल्या २४ तासांत वणी आणि झरी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली. या दोन्ही तालुक्यात सोमवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा, विदर्भा आदी नदींसह सर्वच नाले दुथडी भरून वाहात आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज