शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचा दौरा, अध्यक्ष अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:51 IST

जिल्हा परिषदेत सध्या ‘गुड खिचडी’ सरकार असल्याने वितंडवाद वाढला असून प्रशासन मुजोर झाले आहे.

जिल्हा परिषद : माहितीच दिली नाही, प्रशासनाची अशीही मुजोरी रवींद्र चांदेकर । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेत सध्या ‘गुड खिचडी’ सरकार असल्याने वितंडवाद वाढला असून प्रशासन मुजोर झाले आहे. जिल्हा परिषदेत नेमके काय घडत आहे, याबाबत खुद्द अध्यक्षच अंधारात असल्याचे वास्तव पुढे येत आहे. विभागीय आयुक्त पियूष सिंग मंगळवारी प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक आटोपून जिल्हा परिषदेकडे धाव घेतली. जिल्हा परिषदेत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेत प्रथमच विभागीय आयुक्त आले असताना याबाबत अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांना साधी कल्पनाही नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आयुक्त तब्बल दोन ते तीन तास जिल्हा परिषदेत असताना अध्यक्षांना त्याची साधी कल्पनाही असू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्रमुखालाच वास्तूत कोण आले आणि कोण गेले, याची कल्पना नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय मिळणार कसा, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. प्रशासनाने अध्यक्षांना आयुक्त येत असल्याची साधी कल्पनाही दिली नाही. यावरून प्रशासन प्रचंड मुजोर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे प्रमुख हे अध्यक्ष असताना प्रशासन त्यांनाच अंधारात ठेवून आपला कार्यभाग साधत असल्याचे यावरून स्पष्ट झाले. वास्तविक प्रमुख या नात्याने प्रशासनाने त्यांना माहिती देणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या लेखी पदाधिकारी बिनकामी असल्याचे यातून दिसून येते. शासनाने अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला. लोकप्रतिनिधी म्हणून जनता त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येते. मात्र शासनाने प्रशासकीय अधिकार काढून घेतल्याने प्रशासनाच्या लेखी पदाधिकारी बिनकामी झाले आहे. ही झूल काय कामाची ? जिल्हा परिषदेत खुद्द अध्यक्षांनाच अंधारात ठेवून कारभार चालविला जात असेल, तर अध्यक्षपदाची ही झूल काय कामाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अध्यक्षांनाच अंधारात ठेवले जात असेल, तर सदस्यांना विचारणार तरी कोण, असाही प्रश्न आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या लेखी क्षुल्लक ठरत असतील, तर सामान्यांच्या समस्या सोडविणार कोण, असाही प्रश्न आहे. तथापि ‘गुड खिचडी’ सरकारमुळेच यावेळी असे प्रसंग उद्भवत असल्याचे बोलले जाते. पदाधिकारी आणि प्रशासनात समन्वय नसल्याचा हा परिपाक असल्याचे दिसून येते. यात नेमके वरचढ कोण, हा वादाचा मुद्दा असल्याने वितंडवाद वाढतच आहे. आज पालकमंत्र्यांची बैठक गाजणार जिल्हा परिषदेमध्ये गुरुवार २० जुलै रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होत आहेत. या बैठकीत आयुक्तांच्या दौऱ्यापासून खुद्द अध्यक्षांनाच अनभिज्ञ ठेवण्याचा प्रशासनाचा कारभार गाजण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी-सदस्य विरुद्ध प्रशासन असा वाद सुरू आहे. अध्यक्षांना अंधारात ठेवण्याच्या बुधवारच्या प्रकारामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विभागीय आयुक्त येणार असल्याची प्रशासनाने साधी कल्पना दिली नाही. उद्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक होत आहे. त्यात प्रशासनाला याबाबत जाब मागणार आहे. - माधुरी आडे अध्यक्ष, जि.प. यवतमाळ.