शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आयुक्तांचा दौरा, अध्यक्ष अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:51 IST

जिल्हा परिषदेत सध्या ‘गुड खिचडी’ सरकार असल्याने वितंडवाद वाढला असून प्रशासन मुजोर झाले आहे.

जिल्हा परिषद : माहितीच दिली नाही, प्रशासनाची अशीही मुजोरी रवींद्र चांदेकर । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेत सध्या ‘गुड खिचडी’ सरकार असल्याने वितंडवाद वाढला असून प्रशासन मुजोर झाले आहे. जिल्हा परिषदेत नेमके काय घडत आहे, याबाबत खुद्द अध्यक्षच अंधारात असल्याचे वास्तव पुढे येत आहे. विभागीय आयुक्त पियूष सिंग मंगळवारी प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक आटोपून जिल्हा परिषदेकडे धाव घेतली. जिल्हा परिषदेत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेत प्रथमच विभागीय आयुक्त आले असताना याबाबत अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांना साधी कल्पनाही नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आयुक्त तब्बल दोन ते तीन तास जिल्हा परिषदेत असताना अध्यक्षांना त्याची साधी कल्पनाही असू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्रमुखालाच वास्तूत कोण आले आणि कोण गेले, याची कल्पना नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय मिळणार कसा, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. प्रशासनाने अध्यक्षांना आयुक्त येत असल्याची साधी कल्पनाही दिली नाही. यावरून प्रशासन प्रचंड मुजोर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे प्रमुख हे अध्यक्ष असताना प्रशासन त्यांनाच अंधारात ठेवून आपला कार्यभाग साधत असल्याचे यावरून स्पष्ट झाले. वास्तविक प्रमुख या नात्याने प्रशासनाने त्यांना माहिती देणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या लेखी पदाधिकारी बिनकामी असल्याचे यातून दिसून येते. शासनाने अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला. लोकप्रतिनिधी म्हणून जनता त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येते. मात्र शासनाने प्रशासकीय अधिकार काढून घेतल्याने प्रशासनाच्या लेखी पदाधिकारी बिनकामी झाले आहे. ही झूल काय कामाची ? जिल्हा परिषदेत खुद्द अध्यक्षांनाच अंधारात ठेवून कारभार चालविला जात असेल, तर अध्यक्षपदाची ही झूल काय कामाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अध्यक्षांनाच अंधारात ठेवले जात असेल, तर सदस्यांना विचारणार तरी कोण, असाही प्रश्न आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या लेखी क्षुल्लक ठरत असतील, तर सामान्यांच्या समस्या सोडविणार कोण, असाही प्रश्न आहे. तथापि ‘गुड खिचडी’ सरकारमुळेच यावेळी असे प्रसंग उद्भवत असल्याचे बोलले जाते. पदाधिकारी आणि प्रशासनात समन्वय नसल्याचा हा परिपाक असल्याचे दिसून येते. यात नेमके वरचढ कोण, हा वादाचा मुद्दा असल्याने वितंडवाद वाढतच आहे. आज पालकमंत्र्यांची बैठक गाजणार जिल्हा परिषदेमध्ये गुरुवार २० जुलै रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होत आहेत. या बैठकीत आयुक्तांच्या दौऱ्यापासून खुद्द अध्यक्षांनाच अनभिज्ञ ठेवण्याचा प्रशासनाचा कारभार गाजण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी-सदस्य विरुद्ध प्रशासन असा वाद सुरू आहे. अध्यक्षांना अंधारात ठेवण्याच्या बुधवारच्या प्रकारामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विभागीय आयुक्त येणार असल्याची प्रशासनाने साधी कल्पना दिली नाही. उद्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक होत आहे. त्यात प्रशासनाला याबाबत जाब मागणार आहे. - माधुरी आडे अध्यक्ष, जि.प. यवतमाळ.