शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त

By admin | Updated: April 14, 2016 01:58 IST

चापडोह प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याने एका शेतकऱ्याने जिल्हा कचेरीवर जप्ती आणून ...

रामनगरचा शेतकरी : २९ लाख ८४ हजार वसुलीचे प्रकरण यवतमाळ : चापडोह प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याने एका शेतकऱ्याने जिल्हा कचेरीवर जप्ती आणून बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त केले. या कारवाईने एकच खळबळ उडाली. यवतमाळ तालुक्यातील चापडोह प्रकल्पात बजाबाई लक्ष्मण राठोड रा. रामनगर (यावली) यांची १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा वाढीव मोबदला म्हणून १३ लाख ३० हजार रुपये मंजूर झाले होते. परंतु विशेष भूसंपादन अधिकारी लघु सिंचन यांनी ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बजाबाई राठोड यांचे वारस छगन लक्ष्मण राठोड यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर २९ जुलै २०१० रोजी न्यायालयाने वॉरंट बजाविला. परंतु विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी पैशासाठी मुदत मागितली. त्यावरून त्यावेळी मुदतवाढ देण्यात आली. मात्र मोबदल्याचे पैसेच दिले नाही. छगन राठोड यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शासनाविरुद्ध डिक्री पारित केली. वाढीव मोबदल्याचे व्याजासह २९ लाख ८४ हजार ६५५ रुपये झाले आहे. या रकमेच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिले. हा डिक्री आदेश घेऊन शेतकरी छगन राठोड, त्यांचा मुलगा वैभव राठोड, न्यायालयाचे बेलिफ बी.बी. भारशंकर, संतोष जाधव आणि अनिल निकम बुधवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी बैठकीत असल्याने जप्तीची कारवाई सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला आपल्या कक्षात बोलावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी काही एक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. चापडोह प्रकल्प जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्याने या पैशासाठी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही पैशाबाबत असमर्थता दर्शविली. शेतकऱ्याने पुढच्या मुदतीच्या धनादेशाची मागणी केली. परंतु तेही मान्य झाले नाही. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन (एम.एच.२९-एम-९७७९) जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन सुपूर्दनाम्यावर परत करण्यात आले. (शहर वार्ताहर)