शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरच...

By admin | Updated: July 17, 2015 02:27 IST

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग गुरूवारी शहरात आल्याने दिवसभर कर्मचारी, अधिकारी, नागरिक तसेच तालुक्यातील जनतेत कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरचीच चर्चा होती.

नागरिकांची उसळली गर्दी : जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याने अधिकाऱ्यांची उडाली प्रचंड तारांबळपांढरकवडा : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग गुरूवारी शहरात आल्याने दिवसभर कर्मचारी, अधिकारी, नागरिक तसेच तालुक्यातील जनतेत कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरचीच चर्चा होती. प्रत्येक जण कलेक्टर आले का, कोठे गेले, काय केले, हीच चर्चा एकमेकांसोबत करीत असल्याचे चित्र दिसून आले. काही कर्मचारी त्यांच्या लोकेशनबाबत फोनवर माहिती मिळवत असतानाही दिसत होते. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ दिसून आली. नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या गर्दीने एक वेगळा विक्रम निर्माण केला. जिल्हाधिकारयांनी दिवसभर गावांना भेटी देणे, आढावा सभा, नागरिकांच्या समस्या या सर्व बाबींना वेळ दिल्याने प्रशासन कसे असते, याचा एक नमुनाच सादर झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या तालुक्यातील मांगुर्डा या गावी भेट दिली. त्यांनी गावाची पाहणी केली. त्यानंतर तेथे जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यानंतर ते पांढरकवडा शहरात दाखल झाले. येथील शहीद नागेश्वर जिड्डेवार रंगमंचमध्ये त्यांच्यासह डॉ.कलशेट्टी यांनी पांढरकवडा, घाटंजी, झरीजामणी तालुक्यातील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महसूल, कृषी विभाग, पोलीस, नगरपरिषद आदी सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांना जनतेची कामे तातडीने करा, तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा हे नाव उच्चाटन करण्यासाठी कामे करण्याचे, गावकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा व जनतेची सेवा करा, असे निर्देश दिले. तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत कामामध्ये हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. यानंतर डॉ.कलशेट्टी यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात नागरिकांच्या समस्या व निवेदन घेण्यासाठी वेळ दिली. तेथे आपल्या समस्या व निवेदन देण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. समस्या सांगण्यासाठी व निवेदन देण्यासाठी झालेल्या गर्दीने प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास दिसून येत होता. त्यांनी सर्वांचे म्हणणे शांततेने ऐकून घेतले. गुरूवारी दिवसभर त्यांच्या धडाक्याने प्रशासनाची ‘स्पीड’ प्रथमच तालुक्यातील नागरिकांना दिसून आली. (शहर प्रतिनिधी)ग्रामस्थ समाधानीतालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पांढरकवडा येथे दाखल झाले होते. या सर्व ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन विविध समस्या कथन केल्या. अनेकांनी समस्यांचे निवेदनही त्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची ग्वाही यावेळी त्यांना दिली.