शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दिवसभर कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरच...

By admin | Updated: July 17, 2015 02:27 IST

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग गुरूवारी शहरात आल्याने दिवसभर कर्मचारी, अधिकारी, नागरिक तसेच तालुक्यातील जनतेत कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरचीच चर्चा होती.

नागरिकांची उसळली गर्दी : जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याने अधिकाऱ्यांची उडाली प्रचंड तारांबळपांढरकवडा : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग गुरूवारी शहरात आल्याने दिवसभर कर्मचारी, अधिकारी, नागरिक तसेच तालुक्यातील जनतेत कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरचीच चर्चा होती. प्रत्येक जण कलेक्टर आले का, कोठे गेले, काय केले, हीच चर्चा एकमेकांसोबत करीत असल्याचे चित्र दिसून आले. काही कर्मचारी त्यांच्या लोकेशनबाबत फोनवर माहिती मिळवत असतानाही दिसत होते. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ दिसून आली. नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या गर्दीने एक वेगळा विक्रम निर्माण केला. जिल्हाधिकारयांनी दिवसभर गावांना भेटी देणे, आढावा सभा, नागरिकांच्या समस्या या सर्व बाबींना वेळ दिल्याने प्रशासन कसे असते, याचा एक नमुनाच सादर झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या तालुक्यातील मांगुर्डा या गावी भेट दिली. त्यांनी गावाची पाहणी केली. त्यानंतर तेथे जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यानंतर ते पांढरकवडा शहरात दाखल झाले. येथील शहीद नागेश्वर जिड्डेवार रंगमंचमध्ये त्यांच्यासह डॉ.कलशेट्टी यांनी पांढरकवडा, घाटंजी, झरीजामणी तालुक्यातील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महसूल, कृषी विभाग, पोलीस, नगरपरिषद आदी सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांना जनतेची कामे तातडीने करा, तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा हे नाव उच्चाटन करण्यासाठी कामे करण्याचे, गावकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा व जनतेची सेवा करा, असे निर्देश दिले. तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत कामामध्ये हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. यानंतर डॉ.कलशेट्टी यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात नागरिकांच्या समस्या व निवेदन घेण्यासाठी वेळ दिली. तेथे आपल्या समस्या व निवेदन देण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. समस्या सांगण्यासाठी व निवेदन देण्यासाठी झालेल्या गर्दीने प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास दिसून येत होता. त्यांनी सर्वांचे म्हणणे शांततेने ऐकून घेतले. गुरूवारी दिवसभर त्यांच्या धडाक्याने प्रशासनाची ‘स्पीड’ प्रथमच तालुक्यातील नागरिकांना दिसून आली. (शहर प्रतिनिधी)ग्रामस्थ समाधानीतालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पांढरकवडा येथे दाखल झाले होते. या सर्व ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन विविध समस्या कथन केल्या. अनेकांनी समस्यांचे निवेदनही त्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची ग्वाही यावेळी त्यांना दिली.