शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

कलेक्टर,एसपी साहेब...बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा हो...!

By admin | Updated: July 25, 2015 02:39 IST

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडून यवतमाळला वाहतुकीची शिस्त लावली जाईल,

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडून यवतमाळला वाहतुकीची शिस्त लावली जाईल, अशी रास्त अपेक्षा जनतेला आहे. ही शिस्त लावण्यासाठी आधी व्यापारपेठेतील अतिक्रमण हटविणे व वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. हे काम या दोन तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातच होऊ शकेल, असा विश्वास जनतेला आहे. यवतमाळात रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कार्यालयासभोवतालचे अतिक्रमण हटविले. गेल्या आठवड्यात मुख्यालयातून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जात असताना एसपींनी पाचकंदील चौकातील बेशिस्त वाहतूक अनुभवली. त्यांनी लगेच तेथे स्वत: उभे राहून ही बेशिस्त दूर केली व विस्कळीत वाहतुकीवर पोलिसांना धारेवर धरले. त्यामुळे यवतमाळकर जनतेच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या. प्रशासनाने वाहनांना शिस्त लावावी, आम्हीही शिस्तीत राहण्यासाठी तयार आहोत, अशी ग्वाही जनतेतून दिली जात आहे. यवतमाळ शहरातील व्यापारपेठ आधीच लहान आहे. अवघ्या एक किलोमीटरच्या परिघात येथील बाजार आहे. मात्र या सर्वच बाजार ओळींमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले गेले आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होऊन बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होते. बाजार ओळीत कुठेही फिरले तरी दुकानाचेच अतिक्रमण रस्त्यावर आल्याचे चित्र पहायला मिळते. अगदी पहाटे अथवा रात्री दुकान बंद झाल्यानंतर बाजारओळ मोकळी दिसते. मात्र प्रत्यक्ष दुकाने सुरू असताना अर्धा अधिक बाजार रस्त्यावरच मांडलेला असल्याचे दिसून येते. दुकानातील ग्राहकांना दिसण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात माल रस्त्यावर काढला जातो. दुकानाचे बोर्ड रस्त्यावर आलेले आहे. दुकानासमोरील वाहने ठेवण्याच्या जागेवरही सिमेंट क्राँकीट टाकून ती जागा ताब्यात घेतली गेली आहे. कापड दुकानांमध्ये तेथे पुतळे लावले जातात. अनेक दुकानांचे काऊंटर या पार्किंगच्या जागेत थाटले गेले आहे. मुख्य रस्त्यापर्यंत शक्यतेवढी जागा सिमेंट ओट्यांनी व्यापली आहे. त्यापुढे ग्राहकांना वाहनांचे पार्किंग करावे लागते. बाजारपेठेत दुचाकी वाहनांच्याच पार्किंगची निट व्यवस्था नाही. तेथे चारचाकी वाहनांची पार्किंग करताना किती नाकीनऊ येत असतील याची कल्पना येते. पार्किंगच्या या कारणावरुन अनेकदा भांडणे उदभवतात, मारापीटीपर्यंत प्रकार घडतात. ग्राहकांच्या बळावर लाखो रुपये कमावणारा दुकानदार मात्र एक तर बघ्याची भूमिका घेतो किंवा थेट हातवर करतो. दुकानदारांच्या अतिक्रमण व पार्किंगची सोय नसल्याने खरेदीला येणाऱ्या ग्राहकांना मात्र प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. व्यापारी-व्यावसायिक मंडळी अतिक्रमण काढण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेचे ‘तोंड भरुन’ आतापर्यंत संरक्षण मिळवित होते. ‘नॉनकरप्ट’ प्रतिमा असलेले कलेक्टर, एसपींच्या काळात मात्र संरक्षण देणाऱ्यांची तोंडे रिकामी व्हावी आणि नागरिकांच्या सोईसाठी अतिक्रमण हटवून तेथे पार्किंगची व्यवस्था व्हावी ही यवतमाळकर जनतेची मागणी आहे. बहुतांश दुकानांचे अतिक्रमण सरकारी रस्त्यावर बऱ्याच दूरपर्यंत आले आहे. या दुकानांमध्ये येणाऱ्या मालाची वाहने दिवस-दिवसभर दुकानापुढे उभी राहतात. त्यामुळे अपघात वाढले आहे. हार्डवेअरच्या दुकानांपुढे तर टीन व अन्य लोखंडी साहित्य ट्रकमधून उतरविताना, ने-आण करताना वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भयावह स्थिती आहे. आर्णी रोड, गोदनी रोड, पांढरकवडा रोड या मार्गावरसुद्धा अशीच समस्या कायम आहे. शहरात वाढलेल्या या अतिक्रमणासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी, प्रशासन, अभियंते, वाहतूक पोलीस व दंडाधिकारीय यंत्रणा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदार असल्याचा ठपका नागरिकांमधून ठेवला जात आहे. त्यातही महत्वाची भूमिका ही नगर परिषद व नगररचना, नझूल विभागाने वठविल्याचे दिसून येते. गरिबांचे अतिक्रमण काढा, मात्र मोहिमेची सुरुवात श्रीमंतांची दुकाने असलेल्या मुख्य बाजारपेठेतून करावी, असा नागरिकांमधील एकमुखी सूर आहे. आतापर्यंत अतिक्रमण मोहीम पूर्णवेळ राबविल्याची नोंद नाही. केव्हा तरी दरवर्षी मोहीम सुरू होते आणि काही दिवस चालवून अर्ध्यातून मधातच केव्हा तरी बंद होते असाच बहुतांश अनुभव आहे. त्यात नेहमीप्रमाणे टपऱ्या-पानठेले हटविले जातात. काही दिवसांनी ते पुन्हा येऊन बसतात. वारंवार हटविल्यानंतरही पुन्हा अतिक्रमण होत असेल तर थेट फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आहे.