शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला थंड प्रतिसाद

By admin | Updated: March 27, 2016 02:25 IST

यवतमाळ जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला पहिल्या पंधरवड्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे.

१५ दिवसांत केवळ ८३७ अर्ज : बहुतांश शेतकरी योजनेपासून अनभिज्ञराळेगाव : यवतमाळ जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला पहिल्या पंधरवड्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत केवळ ८३७ अर्ज दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांचे अर्ज १४ एप्रिलपर्यंत स्वीकारले जाणार असले तरी आजचा प्रतिसाद पाहता पुढेही अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, याविषयी साशंकता आहे. शेततळ्यासाठी प्रतिसाद न मिळण्यास विविध कारणे सांगितली जात आहे. प्रगत जिल्ह्यात सदर योजनेंतर्गत उद्दिष्टाच्या तब्बल पाचपट प्रतिसाद पहिल्या पंधरवड्यात मिळाला. सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळाने सतत होरपळणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात केविलवाणा प्रतिसाद आहे. इतका अल्प प्रतिसाद का राहिला याची कारणे शोधून उर्वरित दिवसात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे यासाठी शासकीयस्तरावर जोरदार प्रयत्नाची गरज व्यक्त केली जात आहे.भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे, सधन जिल्हे असलेल्या आणि इंटरनेटचा वापर सर्वाधिक असलेल्या नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी अनुक्रमे १२ हजार २३२ आणि दहा हजार ३२९ शेतकऱ्यांचे अर्ज १५ दिवसात दाखल झाले आहेत. ते उद्दिष्टाच्या तुलनेत आजच पाचपट अधिक झाले आहे. नाशिकला दोन हजार ५०४, तर अहमदनगरला दोन हजार ३९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. मुदत संपेपर्यंत अधिक मागणी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या, लोकसंख्येच्यादृष्टीने मोठा आहे. शेतकरी संख्याही फार मोठी आहे. पण अर्ज मात्र ८३७ आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नाही. योजनेचा प्रसार, प्रचार करण्यास कृषी विभाग कमी पडला आहे. त्यानंतर अर्ज आॅनलाईन भरायचे आहेत. अनेक ठिकाणी ही सुविधा नसल्याने, शासकीय पातळीवर याबाबत सहकार्याची कमतरता राहत असल्यानेही आकडा अल्प राहिला आहे. शेतकऱ्यासाठी जवळपास ५० हजार रुपये शेतकऱ्याला प्रथम स्वत:जवळचे गुंतवायचे आहे. सद्यस्थितीत होरपळलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती त्यात गुंतवणूक करण्याची नाही. बँकांचे कृषी कर्ज, वीज पंपाचे बिल चुकविण्याला त्यांची प्राथमिकता राहिली आहे. या व इतर कारणांमुळेही जिल्ह्यात शेततळ्यांसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते. (तालुका प्रतिनिधी)