शहरं
Join us  
Trending Stories
1
एकजूटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
2
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
3
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
4
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
5
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
6
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
7
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
8
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
9
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
10
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
11
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
12
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
13
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
14
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
15
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
16
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
17
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
18
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
19
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
20
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!

बंद घरे आणि मंदिरेही चोरट्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: May 23, 2015 00:10 IST

वाघापूर-लोहारा या वळण रस्त्यावरील नवीन वसाहतींमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

घरफोड्या वाढल्या : पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणीयवतमाळ : वाघापूर-लोहारा या वळण रस्त्यावरील नवीन वसाहतींमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घर फोडण्यासह मंदिरही चोरट्यांनी टार्गेट केले आहे. कुठलीही घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे पाहता तक्रारी देण्याचेही टाळले जात आहे. रात्री २ ते ५ वाजताच्या सुमारास या चोऱ्या होत आहेत. मैथिलीनगर, साठवणे ले-आऊट, अहल्यानगरी यासह विविध भागांमध्ये घरफोड्या झाल्या. काही दिवसांपूर्वी भरदिवसा तीन घरे फोडण्यात आली होती. आता घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरी केली जात आहे. मुख्य दाराचे कुलूप तोडून आत शिरलेले चोरटे महागड्या वस्तू किंवा रोखेचा शोध घेतात. यासाठी कपाट, दिवाण आदी प्रकारच्या वस्तूची तोडफोड करून ठेवतात. अंधाराचा फायदा घेत चोरी केली जात आहे. साधारणत: चार वाजतापर्यंत हाती लागेल तेवढ्या महागड्या वस्तू घेवून चोरटे पसार होतात. आता तर या चोरट्यांनी मंदिरांनाही आपले लक्ष्य केले आहे. मूर्ती आणि दानपेटीही लंपास करण्याचे प्रकार वाढले आहे. मैथिलीनगरातील गणपती मंदिरात मागील काही दिवसात दोनवेळा हा प्रकार घडला. वाघापूर-लोहारा या वळण मार्गावरून रात्रभर वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र पोलिसांचे वाहन अपवादानेही या भागातून गस्त घालताना दिसत नाही. परिसरातील बंद दिव्यांमुळे सर्वत्र काळोख असतो. या संधीचाही फायदा चोरटे घेत आहे. ग्रामपंचायतीकडून खांबावरील पथदिवे लावण्यास टाळाटाळ केली जाते. तोंडी तक्रार केल्यानंतर पाच-सहा महिन्यानंतर लावलेला दिवाही बंद पडतो. चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)कळंबमध्ये रात्रीतून तीन घरफोड्याकळंब : शहरात गुरुवारी रात्री तीन धाडसी घरफोड्या झाल्या. वारंवार होणाऱ्या घरफोड्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील महावीरनगरातील रहिवासी संदीप मोहुर्ले यांच्या घराच्या मागील दाराची कडी तोडून सुटकेसमध्ये असलेले २० हजार रुपये लंपास केले. याच भागातील ठाकरे आणि धनराज पाटील यांची घरेही अज्ञात चोरट्यांनी फोडली. घरातील साहित्य लंपास केले. सुदैवाने मौल्यवान साहित्य चोरट्यांच्या हाती लागले नाही. त्यांच्या घरातील बँग जवळच्या नाल्यात अस्ताव्यस्त आढळून आल्या. या आधी काही दिवसांपूर्वी गांधी चौकातील रहिवासी प्रशांत मधुकर फाळके, प्रशांत विलास खसाळे, गजानन मुके आणि डॉ.कोल्हे यांच्या घरावरही चोरट्यांनी डल्ला मारला. तेथून मौल्यवान साहित्य आणि रोख लंपास केली. विशेष म्हणजे मागील एक महिन्यांपूर्वी शर्मा-ले आऊट मधील विनायक मस्कर यांचे घर भरदिवसा फोडले होते. त्याचा तपास अजूनही पोलिसांना लावता आलेला नाही. वारंवार होणाऱ्या चोऱ्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांना तत्काळ जेरबंद करा, अशी मागणी नागरिकातून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)