शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२०७ संग्राम केंद्र बंद

By admin | Updated: July 2, 2016 02:32 IST

ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी आणि विविध संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाभरात सुरू करण्यात आलेले १२०७ संग्राम केंद्र

आर्थिक तरतूदच नाही : आॅनलाईन प्रमाणपत्रांसाठी धावाधावरूपेश उत्तरवार यवतमाळ ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी आणि विविध संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाभरात सुरू करण्यात आलेले १२०७ संग्राम केंद्र निधी तरतूदीअभावी सध्या बंद पडले आहेत. याचा थेट परिणाम ग्रामपंचायतीच्या व्यवहारावर झाला असून, नागरिकांना आॅनलाईन प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचातीचा व्यवहार आॅनलाईन करण्यासाठी संग्राम केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. याठिकाणाहून १९ प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच संपूर्ण व्यवहारावरही नियंत्रण ठेवले जाते. यासाठी १३ व्या वित्त आयोगातून आर्थिक तरतूद करण्यात आली होती. मात्र आता १४ वा वित्त आयोग जाहीर होताच ही तरतूद बंद करण्यात आली. परिणामी संग्रामकेंद्र बंद पडले. परिणामी नागरिकांना विविध प्रमाणपत्रासाठी आता तालुका अथवा जिल्ह्याचे स्थळ गाठावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या व्यवहारावरही त्याचा थेट परिणाम झाला आहे. संग्रामकेंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर संपूर्ण कामकाज पारदर्शक करण्यात आले होते. संग्राम केंद्रांच्या माध्यमातून दररोजचा हिशेब ग्रामविकास विभागापर्यंत पोहोचविल्या जात होता. ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे आॅनलाईन आॅडीट यामुळे सरकार दरबारी जमा होत होते. प्रत्येक पैशाचा हिशेब लागत होता. यातून गैरप्रकारालाही आळा बसला होता. यासोबतच जन्म-मृत्यू, विवाह प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, घरटॅक्स आणि पाणीकर वसुलीची पावती संगणकावर उपलब्ध करून दिली जात होती. सदर काम संग्राम केंद्रातील आॅपरेटर दररोज अपडेट करीत होते. मात्र संग्राम केंद्राच्या निधीसाठी १४ व्या वित्त आयोगात आर्थिक तरतूदच झाली नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात करार संपताच संग्राम केंद्र बंद पडले आहे. काही आॅपरेटरांना तर सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. आॅनलाईन कामकाजाकरिता असलेले संगणक आॅपरेटरअभावी ठप्प झाले आहे. नागरिकांना दाखल्यासाठी आता तालुका अथवा जिल्हास्थळ गाठावे लागत आहे. संग्राम-२ ची घोषणा हवेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत ३० एप्रिलपर्यंत संग्राम टू सुरू करण्याची घोषणा केली होती. संग्राम चालकांना तसे आश्वासनही दिले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी संग्राम केंद्र नव्याने सुरू झाले नाही. त्यामुळे आपरेटर संकटात सापडले आहे. आता ग्रामविकास विभाग यावर काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.