शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

मनस्वच्छतेतून होते स्वच्छ ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:06 IST

आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देन्यायाधीशांचे मनोगत : परसोडा येथे घंटागाड्यांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले.तालुक्यातील परसोडा येथे घंटागाड्यांचे लोकार्पण करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परसोडा येथे ग्रामसभा व ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत घंटागाडी लोकार्पण सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण, ठाणेदार यशवंत बाविस्कर, अ‍ॅड.प्रमोद चौधरी, विस्तार अधिकारी प्रफुल ठेंगेकर, ग्रामसेवक मंगल अंबुरे, पोलीस पाटील राजेश देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष रंगराव आडे, भाऊ बळवंते, विठ्ठल देशमुख उपस्थित होते. प्रथम गावातून फेरफटका मारून पाहुण्यांनी स्मशानभूमी सौंदर्यीकरण, ग्रामपंचायत कार्यालयात सौंदर्यीकरण बघून कौतुक केले. कार्यक्रमात गावात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी परसोडा गावाचा आदर्श ईतर गावांनी घ्यावा, असे आवाहन केले. मनाच्या स्वच्छतेतून ग्राम स्वच्छता साधता येते, हे परसोडा ग्रामस्थांनी करून दाखविल्याबद्दल त्यांनी गावाचे कौतुक केले. संचालन सरपंच अतुल देशमुख यांनी केले. आभार मुख्याध्यापक बाबाराव वानखडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी अरुण देशमुख, फुलसिंग राठोड, रमेश कोल्हे, सुदर्शन देशमुख, संतोष पत्रे, प्रशांत गुडे, ज्ञानेश्वर मिसाळ, गजानन शेळके, संगीत शेळके, नारायण सोळंके, विठ्ठल पारधी, प्रेमदास राठोड, संदीप राठोड, संतोष चौधरी, नारायण गुडे, शंकर कोल्हे, आदींनी परिश्रम घेतले. न्यायाधीश गावात आल्याने नागरिकांनी उत्साहात कार्यक्रमात सहभाग घेतला.