शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मनस्वच्छतेतून होते स्वच्छ ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:06 IST

आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देन्यायाधीशांचे मनोगत : परसोडा येथे घंटागाड्यांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले.तालुक्यातील परसोडा येथे घंटागाड्यांचे लोकार्पण करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परसोडा येथे ग्रामसभा व ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत घंटागाडी लोकार्पण सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण, ठाणेदार यशवंत बाविस्कर, अ‍ॅड.प्रमोद चौधरी, विस्तार अधिकारी प्रफुल ठेंगेकर, ग्रामसेवक मंगल अंबुरे, पोलीस पाटील राजेश देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष रंगराव आडे, भाऊ बळवंते, विठ्ठल देशमुख उपस्थित होते. प्रथम गावातून फेरफटका मारून पाहुण्यांनी स्मशानभूमी सौंदर्यीकरण, ग्रामपंचायत कार्यालयात सौंदर्यीकरण बघून कौतुक केले. कार्यक्रमात गावात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी परसोडा गावाचा आदर्श ईतर गावांनी घ्यावा, असे आवाहन केले. मनाच्या स्वच्छतेतून ग्राम स्वच्छता साधता येते, हे परसोडा ग्रामस्थांनी करून दाखविल्याबद्दल त्यांनी गावाचे कौतुक केले. संचालन सरपंच अतुल देशमुख यांनी केले. आभार मुख्याध्यापक बाबाराव वानखडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी अरुण देशमुख, फुलसिंग राठोड, रमेश कोल्हे, सुदर्शन देशमुख, संतोष पत्रे, प्रशांत गुडे, ज्ञानेश्वर मिसाळ, गजानन शेळके, संगीत शेळके, नारायण सोळंके, विठ्ठल पारधी, प्रेमदास राठोड, संदीप राठोड, संतोष चौधरी, नारायण गुडे, शंकर कोल्हे, आदींनी परिश्रम घेतले. न्यायाधीश गावात आल्याने नागरिकांनी उत्साहात कार्यक्रमात सहभाग घेतला.