शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याच्या निषेधार्थ घाटंजी शहरात कडकडीत बंद

By admin | Updated: April 10, 2015 00:11 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून घाटंजी येथे झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी घाटंजी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

घाटंजी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून घाटंजी येथे झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी घाटंजी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली.माजी नगरसेवक सतीश मलकापुरे यांच्या घरावर ६ एप्रिल रोजी हल्ला करून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार व समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र तीन दिवस होऊनही घाटंजी पोलिसांंनी एकाही आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी राम मंदिरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गुरुवारी एक दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. सकाळपासूनच घाटंजी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नाही. भाजपा, शिवसेना, व्यापारी, युवक काँग्रेस व काही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी राम मंदिर येथून मोर्चा काढला. हा मोर्चा पोलीस ठाण्यात पोहोचला. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, ठाणेदार भारत कांबळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. सदर हाणामारीच्या घटनेच्या दिवशी एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तो गुन्हा दाखल करून घेण्यास यावेळी बाध्य करण्यात आले. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चात भाजपाचे सतीश मलकापुरे, राजू सूचक, विष्णूपंत नामपेल्लीवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश उन्नरकर, सेनेचे विक्रम जयस्वाल आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (लोकमत चमू)