शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगतचा परिसरही तहानलेलाच

By admin | Updated: May 17, 2014 00:30 IST

शहराला लागून असलेला ग्रामीण भागातही यावर्षी तीव्र पाणीटंचाई आहे. उमरसरा, वाघापूर, लोहारा, वडगाव, भोसा, पिंपळगाव, मोहा या परिसरातील नागरिकांनासुद्धा यावर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे

यवतमाळ : शहराला लागून असलेला ग्रामीण भागातही यावर्षी तीव्र पाणीटंचाई आहे. उमरसरा, वाघापूर, लोहारा, वडगाव, भोसा, पिंपळगाव, मोहा या परिसरातील नागरिकांनासुद्धा यावर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याही परिसरात मोठय़ा प्रमाणात जीवन प्राधिकरणाने नळजोडण्या दिलेल्या आहेत. परंतु आता पाणी मात्र पोहचत नाही.

यवतमाळ शहराइतकीच लोकसंख्या शहराला लागून असलेल्या या ग्रामपंचायत परिसरात आहे. परंतु सध्या शहरातच मोठय़ा प्रमाणात पाणीसंकट असल्यामुळे ग्रामपंचायत परिसराकडे दुर्लक्ष होत आहे. सबंधित प्रत्येक ग्रामपंचायतचे दिवसेंदिवस वाढते क्षेत्रफळ आणि वाढती लोकसंख्या पाहता या ग्रामपंचायतीसुद्धा आपापल्या परिसराला पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. ग्रामपंचायतींजवळ वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम यंत्रणासुद्धा नसल्याचे दिसून येते.

उमरसरा परिसरातील काही भागात प्राधिकरणासोबतच ग्रामपंचायतसुद्धा पाणी पुरवठा करते. परंतु इतर मोठा भाग पाण्यापासून वंचित आहे. त्यातच ग्रामपंचायतीचे पाणी हे फिल्टर केलेले नसते. त्यामुळे नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. प्राधिकरणाच्या नळाला या परिसरात म्हणायला एक दिवस आड पाणी येते. परंतु नळाला पाणी कधी येईल, याची काहीच खात्री राहत नाही. उमरसरा परिसर हा चढावर असल्याने या भागात पाणी पोहचायला वेळ लागतो. अनेकवेळा नळ जायच्या वेळेवर लोकांकडे पाणी पोहचते. त्यामुळे त्यांना दोन गुंडही पाणी मिळेनासे होते. हे पाणी पोहचण्याची कोणतीही वेळ नसते. कधी रात्री बारा वाजता तर कधी सकाळी पाच वाजता नळांना पाणी येते. त्यामुळे रात्र जागून काढल्याशिवाय कोणताही पर्याय नागरिकांकडे नसतो.

या परिसरात काही लोकांकडे बोअरवेल असले तरी सध्या बोअरवेलला फारसे पाणी नाही. विहिरी व हातपंपसुद्धा कोरडे पडले आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती अटळ आहे. ज्यांच्याकडे टिल्लू मोटर आहे असे लोक पाणी ओढून घेतात. अशावेळी त्याच लाईनवरील पुढील लोकांना मात्र पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. इतर ग्रामपंचायत परिसरांचीही हिच स्थिती आहे. पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायतींकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. अनेकांनी त्यांच्या घरगुती नळाला पाणी येत नसल्याने भटकंती केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. याबाबत वारंवार जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन निवेदनेसुद्धा नागरिकांच्या वतीने देण्यात आले. अनेकवेळा महिलासुद्धा प्राधिकरण कार्यालयावर गेल्या. परंतु त्यांना थातूर-मातूर आश्‍वासन देऊन परत पाठविल्या जाते. नागरिकांनी नळाला तीन ते चार फूट खड्डे खोदले आहेत. तरीसुद्धा पाणी मिळत नाही. कधीकाळी पाणी आल्यास त्याला फोर्स राहत नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी जनतेची विचारपूस करायलासुद्धा या काळात तयार नाही. शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. ग्रामीण भागात तशी सोय नसल्याचे उमरसरा येथील नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)