शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

यवतमाळ शहरातील कचरा तुंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

या कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही कापला जातो. मात्र संस्था हा हप्ता संबंधित शासकीय यंत्रणेडके जमा करीत नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शुक्रवारी घंटागाडी, अ‍ॅपे, वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देकामगारांचे कामबंद : तीन महिन्यांपासून वेतन अडकले, कुटुंबांवर उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील स्वच्छतेचे कामकाज करणाऱ्या कामगारांना गत तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यामुणे कामगारांनी शुक्रवारपासून कामबंद आदांलनाचे हत्यार उपसले. यातून शहरात कचरा तुंबला आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दीत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या कामाचे कंत्राट लातूर येथील संस्थेला देण्यात आले आहे. ही संस्था कामगारांचे वेतन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा कामागारांचा आरोप आहे. कामगारांना मे महिन्यापासून संस्थेने वेतन दिले नाही. त्यामुळे १२० कामगारांचे वेतन रखडले आहे. कंत्राटदाराने आज, उद्या वेतन देतो असे सांगत आजपर्यंत वेळ ढकलत नेली. त्यामुळे आता कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.या कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही कापला जातो. मात्र संस्था हा हप्ता संबंधित शासकीय यंत्रणेडके जमा करीत नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शुक्रवारी घंटागाडी, अ‍ॅपे, वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी कामगारांनी वेतन मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. यामुळे शहरात शुक्रवारी कचरा संकलन करणारे वाहन फिरले नाही. सर्व वाहने दिवसभर आझाद मैदानात उभी होती. कामगारांनी कंत्राटदार कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कमलेश गेडाम, मोहन भगत, बादल पेटकर , विजय धुळे, शैलेश खंदारे, मनोज कबाडे, मंगेश भारती, जमीर खान यांच्यासह कामगारांनी विविध मागण्याचे निवेदन मुख्याधिकाºयांना सादर केले. तत्काळ वेतन अदा करण्याची मागणी लावून धरली. हा तिढा न सुटल्याने आता शहरात कचरा तुंबणार आहे.मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडल्या व्यथाकामगारांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर विविध समस्या कथन केल्या. भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करूनही ती शासनाकडे भरली जात नाही. यामुळे कामगारांना आर्थिक फटका सोसावा लागतो. यासाठी कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप कामगारांनी केला. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी कामगारांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याची ग्वाही दिली. मात्र तरीही कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. यामुळे शहरातील स्वच्छतेचा आता बोजवारा उडणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न