शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यवतमाळ शहरातील कचरा तुंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

या कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही कापला जातो. मात्र संस्था हा हप्ता संबंधित शासकीय यंत्रणेडके जमा करीत नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शुक्रवारी घंटागाडी, अ‍ॅपे, वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देकामगारांचे कामबंद : तीन महिन्यांपासून वेतन अडकले, कुटुंबांवर उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील स्वच्छतेचे कामकाज करणाऱ्या कामगारांना गत तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यामुणे कामगारांनी शुक्रवारपासून कामबंद आदांलनाचे हत्यार उपसले. यातून शहरात कचरा तुंबला आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दीत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या कामाचे कंत्राट लातूर येथील संस्थेला देण्यात आले आहे. ही संस्था कामगारांचे वेतन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा कामागारांचा आरोप आहे. कामगारांना मे महिन्यापासून संस्थेने वेतन दिले नाही. त्यामुळे १२० कामगारांचे वेतन रखडले आहे. कंत्राटदाराने आज, उद्या वेतन देतो असे सांगत आजपर्यंत वेळ ढकलत नेली. त्यामुळे आता कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.या कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही कापला जातो. मात्र संस्था हा हप्ता संबंधित शासकीय यंत्रणेडके जमा करीत नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शुक्रवारी घंटागाडी, अ‍ॅपे, वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी कामगारांनी वेतन मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. यामुळे शहरात शुक्रवारी कचरा संकलन करणारे वाहन फिरले नाही. सर्व वाहने दिवसभर आझाद मैदानात उभी होती. कामगारांनी कंत्राटदार कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कमलेश गेडाम, मोहन भगत, बादल पेटकर , विजय धुळे, शैलेश खंदारे, मनोज कबाडे, मंगेश भारती, जमीर खान यांच्यासह कामगारांनी विविध मागण्याचे निवेदन मुख्याधिकाºयांना सादर केले. तत्काळ वेतन अदा करण्याची मागणी लावून धरली. हा तिढा न सुटल्याने आता शहरात कचरा तुंबणार आहे.मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडल्या व्यथाकामगारांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर विविध समस्या कथन केल्या. भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करूनही ती शासनाकडे भरली जात नाही. यामुळे कामगारांना आर्थिक फटका सोसावा लागतो. यासाठी कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप कामगारांनी केला. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी कामगारांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याची ग्वाही दिली. मात्र तरीही कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. यामुळे शहरातील स्वच्छतेचा आता बोजवारा उडणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न