शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

नगराध्यक्ष अल्पमतात अन् शहराचं वाटोळं

By admin | Updated: June 8, 2014 00:10 IST

नगराध्यक्ष योगेश गढिया अविश्‍वास प्रस्ताव जिंकूनही कायम अल्पमतात आहेत, तर सत्तेचा दीर्घ अनुभव असणार्‍या विरोधकांनी सोयीची अलिप्त भूमिका घेतली. यामुळे शहराचं पार वाटोळं झालं आहे. नगरपालिकेत

सुरेंद्र राऊत - यवतमाळनगराध्यक्ष योगेश गढिया अविश्‍वास प्रस्ताव जिंकूनही कायम अल्पमतात आहेत, तर सत्तेचा दीर्घ अनुभव असणार्‍या विरोधकांनी  सोयीची अलिप्त भूमिका घेतली. यामुळे शहराचं पार वाटोळं झालं आहे. नगरपालिकेत शहरवासीयांनी प्रस्थापितांना बाजूला सारत भाजपाला काठावरचे बहुमत दिले. मात्र सत्तेसाठी अस्तित्वात आलेल्या अभद्र आघाडीने कधीच राजकीय स्थैर्य मिळू दिले नाही. नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे  प्रवीण प्रजापती यांना बाजूला सारून ऐन वेळेवर याच पक्षातील योगेश गढिया यांनी सत्ता प्राप्त केली. तेव्हा भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकांनी ताकद दिली. त्यानंतर मात्र योगश गढिया कायम अल्पमतात दिसून आले. पक्षातीलच विरोधकांनी सभागृहातील विरोधकांना हाताशी धरून कायम कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावर मात करण्यासाठी  योगेश गढिया यांच्याकडे निर्णयक्षमता नसल्याने त्यांच्या अनेक राजकीय र्मयादा उघड झाल्या. दोलायमान स्थितीत असल्याने कायम आपली खुर्ची वाचविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शहर विकासारिता राज्य शासनाकडून कधी नव्हे इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी नगरपरिषदेत राजकीय स्थैर्य आणि सक्षम नेतृत्व नाही. नगरसेवकपदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात असलेल्यांनीसुध्दा सोयीचीच भूमिका घेतली आहे. सुरुवातीला अलिप्त राहणार, अशी भूमिका जाहीर करणार्‍या विरोधकांनी अचानकपणे नगराध्यक्षाच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला. ही कोंडी फोडण्यात गढिया यांना यश आले. या व्यतिरिक्त सभागृहात निर्णय घेण्यासाठी लागणारे बहुमत त्यांच्या बाजूने कधीच दिसले नाही. नगरपरिषदेत व्यक्तिगत सूड घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे. येथे सेठ, गुरूजी, साहेब, भाऊ आणि दीर्घ अनुभवी काही नगरसेवक यांच्यातील अंतर्गत वादामुळे शहरात एकही विकासकाम वादंगाशिवाय सुरू झालेले नाही. प्रत्येक कामात आडकाठीच आणण्याचा प्रयत्न झाला. रखडलेल्या कामांसाठी ५ जून रोजी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेची भूमिका समजावून सांगण्यात नगराध्यक्ष पुन्हा एकदा अपयशी ठरले. २१ नगरसेवकांनी आक्षेपावर स्वाक्षर्‍या देऊन एकप्रकारे नगराध्यक्ष अल्पमतात असल्याचे सिध्द केले. असेच प्रकार वारंवार होत राहिल्याने नगरपरिषदेची यंत्रणा कायम द्विधा मन:स्थितीत काम करीत आहे. सत्ताधार्‍यातील अंतर्गत वाद खर्‍या अर्थाने नगरपरिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने ‘कॅश’ केला आहे. या स्थितीत थोडेबहूत समजुतदार असलेल्यांनी हापशी रंगविणे, उद्यानाचे कंत्राट मिळविणे, टॅँकरचे जुने बिल काढणे, शहर स्वच्छता, सावरगड कचरा डेपोतील कंत्राट मिळवून परंपरेप्रमाणे आपले उपजीविकेचे साधन काही नगरसेवकांनी कायम ठेवले आहे. त्यामुळे त्यांनीही रखडलेल्या विकास कामाबाबत साधा ब्रसुध्दा काढला नाही. आपले हितसंबध दुखावल्यानंतरच तात्पुरता विरोध करण्यात स्वत:च्या  दीर्घ अनुभवाचा फायदा करून घेतला आहे. अशा स्थितीत प्रशासक म्हणून मुख्याधिकारीसुध्दा ठोस भूमिका घेत नाही. प्रत्येकाचे बरोबर आहे, असे सांगून दिवस पुढे लोटण्याचे काम सुरू आहे. परिणामी शहरवासीयांना हाल सहन करावे लागत आहे. अतवृष्टीमुळे खरडून गेलेल्या रस्त्यांचे काम असो वा प्राधान्यक्रम चुकविला म्हणून रखडलेले विशेष निधीतील काम. याची जबाबदारी कोणताच नगरसेवक घेण्यास तयार नाही. प्रत्येकजण व्यक्तिगत पातळीवरचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. स्वीकृत सदस्य म्हणून आलेल्या ठेकेदाराने सुरुवातीला कंत्राटातच अधिक रस दाखविल्यामुळे ही प्रक्रिया बरेच दिवस थंडबस्त्यात होती. परिणामी शहरातील कामे सुरूच झाली  नाही. शेवटी दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर वार्डातील नाली आणि रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. प्रत्येकच बाबतीत आर्थिक हितसंबध आणि राजकारण येत असल्याने एकहाती निर्णय होत नाही. हीच स्थिती कायम राहावी अशी नगरपरिषदेत दीर्घ अनुभव घेतलेल्याचीही सुप्त इच्छा असल्याचे दिसून येते. जेणेकरून दुसरा व्यक्ती नगरपरिषद चालवूच शकत नाही, असे चित्र निर्माण करून सत्तेचा मार्ग सुकर करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यासाठी मिळेल त्या आयुधाचा अलिप्त राहून वापर केला जात आहे. नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने सुप्त राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे.