शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या आर्थिक अधिकारांवर येणार गदा

By admin | Updated: November 15, 2014 02:08 IST

भाजपाच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासूनच धडाडीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

यवतमाळ : भाजपाच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासूनच धडाडीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. नगराध्यक्षांकडे असलेले आर्थिक अधिकार गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत लवकरच अधिकृत अध्यादेश येणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषद लेखा संहिता लागू करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वीच नगरपरिषदांसाठी दुहेरी लेखा पद्धती लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.नगरपरिषदेत संपूर्ण आर्थिक व्यवहार हे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने होत होते. मात्र नव्याने लागू करण्यात आलेल्या लेखा पद्धतीत हा अधिकार गोठविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. दीड वर्षांपूर्वीच हा प्रस्ताव राज्य शासनाकडून तयार करण्यात आला होता. मात्र त्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी न झाल्याने तो प्रलंबित होता. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा आर्थिक अधिकार गोठविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांचे संपूर्ण आर्थिक अधिकार लवकरच गोठविले जातील. या निर्णयामुळे नगरपरिषदेतील अध्यक्षाचे महत्त्व कमी होवून तोही नामधारीच राहील, अशी भीती नगरपालिका वर्तूळातून व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षांना आर्थिक अधिकार असूनही बरेचदा प्रशासकीय कामकाज रेंगाळलेले असते. अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्याला दाद देत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आता संपूर्ण विकासालाच खीळ बसेल, असा सूर नगराध्यक्षांकडून आळवला जात आहे. कुणाचेही नियंत्रण नसल्याने नगरपरिषदेच्या बॉडीलाही अर्थ उरणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षांचे अधिकार गोठविण्याऐवजी शहराच्या विकासासाठी अनेक नगरपालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नाहीत, अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ती पदभरती करून परिपूर्ती करणे गरजेचे असल्याचेही नगराध्यक्षांना वाटते. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला पायबंद बसण्याऐवजी खतपाणी घातले जाईल. अनेकांना तर हा लोकशाहीवरचा घालाच वाटतो. ज्याप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अध्यक्ष व सभापतींचे आर्थिक अधिकार काढून घेतले. त्यानंतर आता तेथे अनेक अडचणी उद्भवत आहेत. अधिकार नसल्याने देयके प्रलंबित राहण्याचे प्रमाण या दोनही संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एकंदर प्रशासनाची गती मंदावली आहे. या निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम काय येतील हे पाहून पुन्हा निर्णयाबाबत फेरआढावा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील बहुतांश नगराध्यक्षांचा विरोध असतानासुद्धा यवतमाळ नगराध्यक्षांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अशा संमिश्र प्रतिक्रिया नगराध्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. या निर्णयानंतर नेमका काय परिणाम पालिका प्रशासनावर होईल लवकरच दिसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)