शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

‘अमृत’च्या कामाची विधिमंडळात चिरफाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:19 IST

बेंबळा प्रकल्पातून यवतमाळात पाणी आणण्यासाठी ‘अमृत’ योजनेअंतर्गत ३०२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देपोटकंत्राटदार ऐरणीवर : आठ दिवसात मंत्रिस्तरावर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पातून यवतमाळात पाणी आणण्यासाठी ‘अमृत’ योजनेअंतर्गत ३०२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामात मुख्य कंत्राटदाराकडून कुठलेही निकष पाळले जात नसून पोटकंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचा मुद्दा विधानपरिषदेत गाजला. या गंभीर प्रकरणाची सभागृहात चिरफाड झाल्याने आठ दिवसात मंत्रीस्तरावर बैठक बोलाविण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले. या बैठकीला नगराध्यक्षांनाही निमंत्रित करण्याची सूचना केली.विधान परिषद सदस्य अ‍ॅड. हुस्नबानो खलिफे यांच्या लक्षवेधी सूचनेवरून अमृत योजनेच्या कामाबाबत विधीमंडळात चर्चा झाली ३०२ कोटींच्या कामात जीवन प्राधिकरणने मुख्य पाईपलाईनचे काम प्राधान्याने न करता शहरातील अंतर्गत पाईपलाईनला प्राधान्य दिले. तसेच मुख्य कंत्राटदाराने पोटकंत्राटदार नेमल्याने या कामाचा दर्जाही सुमार असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील अस्तित्वातील पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. परिणामी शहरात २० ते २५ दिवसानंतर पाणी पोहोचते. टंचाई निवारणासाठी नगरपालिकेने सर्वतोपरी निधी व लोकवर्गणीची रक्कम दिली. तरीही या बेंबळा प्रकल्पातून पाणीपुरवठा होण्यासारखी परिस्थिती नाही. मुख्य पाईपलाईन पूर्ण व्हावी, अशी मागणी असतानाही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खलिफे यांनी केला.यावर शासनाच्यावतीने निवेदन करताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बेंबळा प्रकल्पासाठी २७७ कोटी ५२ लाख मंजूर झाल्याचे सांगितले. ही योजना मे २०१७ मध्ये सुरू झाली असून २८ महिन्यात पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या अस्तित्वात असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती वेळच्या वेळी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच एप्रिल २०१८ पर्यंत २८ किलोमीटरच्या मुख्य पाईपलाईनचे काम पूर्ण करून बेंबळाचे पाणी यवतमाळात आणले जाईल, असा असा दावा डॉ. पाटील यांनी केला. तूर्तास शहराला उपलब्ध प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.या गंभीर प्रश्नावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अमृत योजना मोठी असल्यामुळे ती सध्याच्या स्थितीत उन्हाळ्यापर्यंत पूर्ण होऊन यवतमाळला पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे यवतमाळसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश शासनाला दिले. तसेच येत्या आठ दिवसात मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे निर्देश ठाकरे यांनी सरकारला दिले. या बैठकीला यवतमाळ नगराध्यक्ष तसेच विधानपरिषद सदस्य हरिसिंग राठोड यांनाही निमंत्रित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.याच मुद्यावर राज्यमंत्री मदन येरावार यांनी योजनेचे स्वरूप व त्यांनी या संदर्भात केलेला पाठपुरावा याची माहिती सभागृहात दिली. योजनेच्या कामासाठी सरकार सहकार्य करीत असून सर्व अटी मान्य करून ही योजना २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे येरावार यांनी सांगितले.योजनेबाबत मंत्र्यांच्या उत्तरातच विसंगतीविधानपरिषदेत बेंबळा प्रकल्पातून यवतमाळात पाणी आणण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मंत्र्यांनी केलेल्या निवेदनात विसंगती असल्याचे स्पष्ट होते. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हा प्रकल्प एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही दिली, तर यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी हाच प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. यवतमाळकर जनता भीषण पाणीटंचाईने होरपळत असल्याने सर्वांची आस बेंबळाच्या पाण्यावर आहे. मात्र दोन मंत्र्यांच्या उत्तरात विसंगती असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ