शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्वातंत्र्यदिनी गावागावांत होणार बालहक्कांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:47 IST

स्वातंत्र्यदिनी बालहक्कांचा गावागावात जागर केला जाणार आहे.

ठळक मुद्दे२६ वर्षानंतर कराराची आठवण बालमजूर, बालविवाह, बालसंरक्षणाबाबत उपक्रम

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संयुक्त राष्ट्रसंघाने बालहक्क करार करून अनेक वर्ष झाले. मत्र भारतासारख्या विकसनशील देशासह विकसित देशांनीही बालहक्कांकडे दुर्लक्ष केले आहे. आता २६ वर्ष उलटल्यानंतर भारताला या कराराची आठवण झाली असून केवळ खानापूर्ती म्हणून स्वातंत्र्यदिनी बालहक्कांचा गावागावात जागर केला जाणार आहे.संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या करारानुसार मुलांचे हक्क आणि सुरक्षितता याबाबत उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी जिल्हा परिषद सीईओंना दिले आहेत. जीविताचा अधिकार, शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकारी, विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार, कौटुंबिक व सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार आदींबाबत बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने विविध उपक्रम निश्चित केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने बालहक्काचा हा करार चक्क १९८९ मध्ये स्वीकारला. जगातील १९३ देशांनीही तो स्वीकारला आहे. तर भारताने ११ डिसेंबर १९९२ रोजी बालहक्क करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, सरकारने देशातील मुलांना आरोग्य सेवा, शिक्षण, कायदेशीर आणि सामाजिक सेवा पुरविणे बंधनकारक आहे. मात्र १९९२ ते १०१९ उजाडेपर्यंत सरकारला या कराराच्या अमलबजावणीची आठवण झाली नाही. आता अचानक शिक्षण सचिवांनी या कराराची जिल्हा परिषदांना आठवण करून दिली आहे.येत्या स्वातंत्र्यदिनी विविध शाळा आणि गावांमध्ये कोणते उपक्रम राबवावे, याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. मात्र एक दिवस उपक्रम राबवून बालहक्क अबाधित राहतील का, याबाबत जाणकारांनी साशंकता व्यक्त केली आहे. केवळ भाषणबाजी करून नंतर हा बालहक्क करारा बासनात गुंडाळून ठेवला जाईल, अशी शंका व्यक्त केली जात आहे.हे उपक्रम राबविले जाणारग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेत बालहक्क संरक्षणाचा ठराव घेणे बंधनकारक आहे. बालविवाहास प्रतिबंध करण्याबाबत ग्रामसभेत शपथ घेतली जाईल. शाळेच्या प्रभातफेरीत मुलांच्या हाती बालहक्क संरक्षणाचे फलक असतील. ध्वजारोहणावेळी मान्यवरांकडून बालहक्क संरक्षणाची शपथ घेतली जाईल. यात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असेल. गावातील बालरक्षकांचा यावेळी सत्कार होईल.करारानुसार, असे आहेत मुलांचे हक्कजगण्याचा हक्क : यात जीविताचा, विकासाचा, समाधानकारक राहणीमान मिळविण्याचा, परिणामकारक आरोग्यसेवा मिळविण्याचा, अपंग बालकास स्वावलंबनाचा, सामाजिक सुरक्षिततेचा अधिकार.विकासाचा हक्क : मोफत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि व्यवसायिक प्रशिक्षण घेण्याचा अधिकार, सांस्कृतिक, कलात्मक कार्यक्रमात भाग घेण्याचा अधिकार.संरक्षणाचा हक्क : घरापासून दूर असताना संरक्षणासाठी संघर्षाचा, कायद्याच्या कचाट्यात अडकल्यावर संरक्षणाचा अधिकार.सहभागाचा हक्क : जीवनावर परिणाम करणाºया सर्व बाबींमध्ये भाग घेण्याचा अधिकार. स्वत:चा दृष्टिकोन इतरांना ऐकविण्याचा अधिकार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. सभा घेण्याचा, माहिती मिळविण्याचा अधिकार.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस