शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या आडून वाढले बालविवाह; यवतमाळात १२ विवाह ऐनवेळी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 10:19 IST

गेल्या पाच वर्षात नगण्य आढळणारे बालविवाहांचे प्रमाण लॉकडाऊनच्या काळात अचानक वाढले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षात यंदा सर्वाधिक घटना 

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाने शहरांप्रमाणे ग्रामीण जनजीवनालाही कलाटणी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार जाताच किशोरवयीन पोरींना ‘उजवण्या’ची घाई केली जात आहे. जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी गोरगरीब बाप वयाचे बंधन न पाळताच पोरींचे लग्न लावून देत आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षात नगण्य आढळणारे बालविवाहांचे प्रमाण लॉकडाऊनच्या काळात अचानक वाढले आहे.गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात तब्बल ८० बालविवाह ऐनवेळी थांबविण्यात यंत्रणेला यश आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारी ते जून या फक्त पाच महिन्यात १२ बालविवाह उघड झाले. विशेष म्हणजे, २०१५ ते २०१९ या पाच वर्षातील बालविवाहांची संख्या केवळ ११ होती. मात्र लॉकडाऊन सुरू होताच १२ विवाह ठरले. बाल संरक्षण कक्षाने ऐनवेळी ते रोखले.मात्र महाराष्ट्रात जे ८० आणि यवतमाळात जे १२ बालविवाह झाले, ते ठराविक जिल्ह्यातील आणि त्यातही ठराविक तालुक्यांतील आहेत. जेथील नागरिक सजग होते, तेथील घटना ‘रेकॉर्ड’वर आल्या. त्यामुळे ज्या घटनांची माहितीच मिळाली नाही, असे यापेक्षा दुप्पट बालविवाह झाले असण्याची शक्यता बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी व्यक्त केली. यवतमाळ जिल्ह्यात केवळ दारव्हा, दिग्रस, मारेगाव, झरी, वणी, नेर तालुक्यातील घटनांचे वेळेवर ‘रिपोर्टिंग’ झाले. इतर तालुक्यातील बालविवाह ‘गुपचूप’ आटोपले असण्याची भीतीही वर्तविण्यात आली.

 ‘श्रीमंतां’चे गुन्हे दडपलेलॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या बालविवाहाच्या घटना प्रामुख्याने पोड, बेड्यावर उघडकीस आल्या. येथील समाज अत्यंत गरीब आणि अशिक्षित आहे. परंतु, याच काळात शहरी भागातही आणि तथाकथित प्रतिष्ठितांच्या घरातही बालविवाहाच्या घटना घडल्या. मात्र त्या राजकीय दबावापोटी दडपल्या गेल्याचा आरोप होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात ज्या १२ बालविवाहांच्या घटना पुढे आल्या, त्यातील सर्वाधिक पाच घटना एकट्या नेर तालुक्यातील आहेत. मारेगाव तालुक्यात तीन आणि झरी व उमरखेड तालुक्यात प्रत्येकी एक बालविवाह ऐनवेळी रोखला गेला. तर वणी तालुक्याच्या वांजरी गावात एकाच दिवशी चक्क दोन बालविवाहांचा घाट घातला गेला होता.

गाव समित्यांच्या सक्षमीकरणाला ‘ब्रेक’बालविवाह रोखल्यावर संबंधित मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी विविध पावले उचलत आहे. विवाह रोखल्यानंतर प्रत्येक महिन्याला संबंधितांच्या घरी भेटी देणे, त्यांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे ही कामे महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले यांच्या मार्गदर्शनात केली जात आहे. सध्या जिल्ह्यात १६४५ गावांमध्ये बालसंरक्षण समित्या तयार केल्या आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारीतच बैठक घेतली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने त्या उपाययोजनांना सध्या ब्रेक लागला आहे.बालविवाह वाढण्याची ही आहेत कारणेआधीच गरिबी, त्यात लॉकडाऊनमध्ये गेलेला रोजगारहाती पैसा नसल्याने मुलींची ‘जबाबदारी’ लवकर मोकळी करण्याची पित्याची घाईअल्पवयातच गावपातळीवर वाढलेली प्रेमप्रकरणेअल्पवयात झालेल्या गर्भधारणा लपविण्याची धडपडमुले-मुली लवकर ‘वयात’ आल्याचा खेड्यातील समजलॉकडाऊनमध्ये ‘घरीच’ उरकणाºया विवाहाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष

टॅग्स :marriageलग्न