शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:09 IST

राज्यात भाजपाची सत्ता येऊन तीन वर्षे लोटत असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. पदही मिळत नाही, कामेही होत नाहीत, एवढेच काय मुख्यमंत्री वारंवार जिल्हा दौऱ्यावर येऊनसुद्धा त्यांची भेट मिळत नाही, अशा शब्दात भाजपाचे सामान्य निष्ठावान कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देसंधीच्या शोधात : पद नाही, कामेही होत नाहीत, सत्तेत असूनही नाराजी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात भाजपाची सत्ता येऊन तीन वर्षे लोटत असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. पदही मिळत नाही, कामेही होत नाहीत, एवढेच काय मुख्यमंत्री वारंवार जिल्हा दौऱ्यावर येऊनसुद्धा त्यांची भेट मिळत नाही, अशा शब्दात भाजपाचे सामान्य निष्ठावान कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.रविवार २४ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यांवर येत आहेत. बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ ते करणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपातील हा नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही चौथी-पाचवी भेट असेल. मात्र कार्यकर्त्यांची साधी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची हौसही पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री सहज भेटत नाहीत, ही कार्यकर्त्यांचीच नव्हे तर अनेक पदाधिकाऱ्यांचीही ओरड असल्याचे सांगितले जाते.कार्यकर्त्यांची आमदारांप्रती, आमदारांची मंत्र्यांप्रती तर मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांप्रती नाराजीचे हे चक्र भाजपात फिरत आहे. बदल्यांची कामे होत नाहीत म्हणून आमदार मंडळी नाराज आहे. बदलीचे काम घेऊन गेले तर पारदर्शकता व प्रिन्सीपल पुढे केले जाते, असा पदाधिकाºयांचा सूर आहे. कामेच होत नसतील तर मतदारसंघातील खर्च भागवायचे कसे असा प्रश्न खासगीत उपस्थित केला जात आहे.बड्या लोकप्रतिनिधींची ही व्यथा असली तरी सामान्य कार्यकर्त्यांची व्यथा मात्र अगदीच सामान्य आहे. जनतेच्या समस्या सोडविणे, घेऊन गेलेले काम करून देणे तर दूरच साधे पत्रही मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची लोकप्रतिनिधींप्रती ओरड आहे. मुख्यमंत्री वेळ देत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. आता रविवारी तरी मुख्यमंत्र्यांशी भेटीची संधी मिळते का याची कार्यकर्त्यांना आस लागली आहे. पक्षस्तरावर होणाऱ्या बैठकांमध्ये ‘केवळ संघटनात्मक बांधणीवर बोला, सरकारबद्दल बोलू नका’, अशा स्पष्ट सूचना आधीच दिल्या जातात. त्यामुळे लोकप्रतिनिधी किंवा सरकारच्या कारभाराबद्दल ब्र काढण्याची सोय राहिलेली नाही.एकूणच कार्यकर्ते निराश आहेत. त्यांना ‘लाभ’ तर दूर साधा भाजपा सरकारमधील सत्तेचे ‘लाभार्थी’ असलेल्या घटकांसोबत फोटो काढण्याचीही उजागरी राहिलेली नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये भाजपा सत्तेत असूनही रोष पहायला मिळतो. सत्तेत नव्हतो तेव्हा अधिक कामे होत होती, नेतेही वेळ देत होते, ही सामान्य कार्यकर्त्यांची बोलकी प्रतिक्रिया नेते मंडळींना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.‘लाभार्थी’ : कुणी वृक्ष तोडतोय, कुणी मत्स्य पकडतोयभाजपा सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचाच कित्ता गिरवित आहे. तीन वर्षे लोटली तरी सामान्य कार्यकर्त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मंडळ-महामंडळ तर दूर साध्या समित्यांवरही वर्णी नाही.‘लाभार्थी’ होण्याची संधी लोकप्रतिनिधींचे डावे-उजवे असलेल्यांनाच मिळते. त्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आणि चेहरेही ठरलेलेच आहेत.दुसºया फळीतील कार्यकर्त्यांना लाभ नव्हेतर पक्ष-संघटनेतील पद देऊन बोळवण केली जाते.हातात झेंडा घेऊन पक्ष जिवंत ठेवणारे कार्यकर्ते मात्र अजूनही कोसोदूर आहेत. मुख्यमंत्री, मंत्री तर दूर आमदारही त्यांना जवळ फटकू देत नाहीत, अशी ओरड आहे.भाजपात आजच्या घडीला संधी साधूंची चालती आहे. कुणी राष्ट्रीय महामार्गावर दहा कोटी बजेटचे वृक्ष तोडतोय तर कुणी निवडणुकीत स्पर्धक राहूनही धरणातून ट्रकने मासोळ्या काढून विकतोय.शासनाचे विभागही ‘हिशेबा’साठी निकटवर्तीयांना वाटून दिले गेले आहेत. डावे-उजवे असलेल्या प्रत्येकाला काहीना काही ‘लाभ’ मिळतो आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस