शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

पावसाळा संपताना पुलांची तपासणी

By admin | Updated: September 29, 2016 01:11 IST

जिल्ह्यातील पूल, मोऱ्यांची तपासणी करण्याबाबत पावसाळा संपताना ग्राम विकास व जलसंधारण विभागाने पत्र पाठविले.

महाड दुर्घटना : वरातीमागून निघाले घोडे यवतमाळ : जिल्ह्यातील पूल, मोऱ्यांची तपासणी करण्याबाबत पावसाळा संपताना ग्राम विकास व जलसंधारण विभागाने पत्र पाठविले. रायगड जिल्ह्यात महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर वरातीमागून घोडे नाचविण्याचा हा प्रकार घडल्याने यंत्रणेलाही झटका बसला आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मोऱ्या, पुलांचे निरीक्षण विविध स्तरावरील अभियंत्यांनी करावयाचे असते. मात्र २०१३-१४ पासून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग, रस्ते व पूल दुरूस्ती तथा परीरक्षणाचा कार्यक्रम ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. यात सार्वजनिक बांधकाम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कामे विभागून दिली.पुलांची देखभाल व दुरूस्ती, तपासणी संदर्भात विविध घटक व प्रतीकूल पर्यावरणामुळे पुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. त्यानुसार पुलांबाबत परीपूर्ण निरीक्षण पद्धती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिपत्रकात विहित केलेल्या पद्धतीनुसार जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाची निरीक्षणे, तपासणी याबाबत कारवाई करण्याबद्दल पावसाळा संपताना ग्राम विकास व जलसंधारण विभागाने नव्याने सूचना दिल्या आहेत.मोऱ्या व पुलांच्या बांधकामाचे निरीक्षणासंदर्भात तांत्रिक स्तरावर विशेष लक्ष पुरविण्याची सूचना देण्यात आली. प्रत्यक्षात बांधकाम संकल्पानुसार मोऱ्या, पूल कार्यरत असल्याची खात्री करावी. अनपेक्षित घटकांमुळे काही बांधकामांना क्षती पोहोण्याची शक्यता असल्याने नित्य नेमाने मोऱ्या, पुलांचे निरीक्षण, देखभाल व दुरूस्तीची सूचनाही देण्यात आली. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांनी पावसाळ्यापूर्वी व पावासाळ्यानंतर पुलांचे निरीक्षण करावयाचे असते. त्यानुसार त्यांनी आवश्यक त्या तपासणी सूची व निरीक्षण प्रपत्रे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुलांचे निरीक्षण, तपासणी करून या सर्व बाबी निरीक्षण नोंदवहीत नोंदविण्याचे निर्देश आहे. अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांनी त्यांच्या स्तरावर निरीक्षण करणे, नोंदवहीची तपासणी करणे आवश्यक आहे. गरज पडल्यास दोष दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळाची मदत घेता येणार आहे. (शहर प्रतिनिधी)पावसाळ्यानंतर सूचनांच्या अंमलबजावणीचे निर्देशग्राम विकास व जलसंधारण विभागाने केलेल्या या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहसचिव दि. ग. मोरे यांनी दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनीच आपल्या स्वाक्षरीनिशी निर्गमित केलेल्या पत्रात यावेळी पावसाळा सुरू झाला असला, तरी पावसाळ्यापूर्वी करावयाची तपासणी, निरीक्षणे आता लगेच करण्याचे निर्देश दिले आहेत. निरीक्षणे, तपासणी, दुरूस्तीचे हे पत्र गेल्या २ आॅगस्टच्या मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर ८ आॅगस्टला निर्गमित करण्यात आले आहे.