शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पालकमंत्र्यांच्या हस्तकांचेच पालिकेत धंदे : आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:29 IST

नगरपरिषदेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. बहुमताच्या जोरावर कुठलेही निर्णय घेतले जात आहे. डिसेंबर २०१६ मध्ये अस्तित्वात आलेल्या नगरपरिषदेला घनकचरा सफाईचा प्रश्न सोडविता आला नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते, नगरसेवकांच्या पत्रपरिषदेने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. बहुमताच्या जोरावर कुठलेही निर्णय घेतले जात आहे. डिसेंबर २०१६ मध्ये अस्तित्वात आलेल्या नगरपरिषदेला घनकचरा सफाईचा प्रश्न सोडविता आला नाही. पालकमंत्री मदन येरावार यांचे हस्तक असलेल्यांनी नगरपालिकेत आपले धंदे थाटले आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शनिवारी येथे घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत केला आहे. या आरोपाने सत्ताधारी भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे.नगरपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर चौधरी, शिवसेना गटनेते गजानन इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते पंकज मुंदे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, एकाच कंत्राटदाराला पालिकेतील अनेक कामे दिली आहेत. या कंत्राटदाराला पालकमंत्र्यांचे पाठबळ आहे. डम्पींग यार्ड नसल्याने शहरातील खुल्या जागा व सर्व्हिस गल्लीमध्ये कचरा साठविला आहे. या कचऱ्यामुळे साथरोगाची लागण होण्याची भीती आहे.पालिका फंडातील निधीतून प्रस्तावित कामे करण्यास कंत्राटदार तयार नाही. कारण पालिकेलाच या कामासाठी पैसा मिळेल की नाही याची शाश्वती नाही. दारू दुकाने वाचविण्यासाठी बहुमताच्या जोरावर शहरातील रस्त्यांचे हस्तांतरण केले. आता दारव्हा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्याची डागडुजी नाही. हे निर्णय पालकमंत्र्यांच्या निर्देशानेच घेतले.अमृत योजनेतील वाटा पालिकेने दिल्यानंतरही वाढीव परिमाणाचे १३ कोटी ७६ लाख देण्याचा ठराव घेतल्याचा आरोप पत्रपषिदेत करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक डॉ. अनिल देशमुख, वैशाली सवाई, विशाल पावडे, जावेद अन्सारी, शिवसेनेचे नगरसेवक उद्धव साबळे, काँग्रेसचे पदाधिकारी अजय किन्हीकर, जुल्फेखार अहमद आदी उपस्थित होते.कचऱ्यावर केवळ राजकारण - पालकमंत्रीपत्रपरिषदेतील आरोपांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मदन येरावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बंद असलेला सावरगड कचरा डेपो सुरू करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला, चार वर्षांपासून विलगीकरनाची यंत्रणा बंद आहे. ती सुरू करण्यासाठी तंत्रज्ञ बोलाविले. निविदा प्रक्रियेबाबतचे निर्णय सर्वसाधारण सभेतच होतात. कचऱ्याची निविदा काढताना अनेक चुका केल्या गेल्या. त्याला पालकमंत्री जबाबदार कसे ?, नगराध्यक्षांनी अशा टेंडरला मंजुरी दिलीच कशी?, आरोप करणाऱ्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात मंजुरी कशी दिली. एमआयडीसीत कचऱ्यासाठी पर्यायी जागा निवडली असता त्याला शिवसेनेचे नगरसेवकच विरोध करीत आहेत. केवळ राजकारण करण्यापलिकडे कोणतेच काम नाही. समस्या सोडविण्यासाठी ते पुढे येत नाहीत, असेही पालकमंत्री म्हणाले.पालिकेत बहुमताच्या जोरावर जंगलराजनगरपरिषदेत बहुमताच्या जोरावर जंगलराज सुरू आहे. डुक्कर पकडण्याच्या कारवाईत एका आरोग्य निरीक्षकाला डांबून धमकाविण्यात आले होते. माजी आरोग्य सभापतीनेच गांडूळ प्रकल्पावर महिन्याला दीड लाखांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे हे महोदयच सभापती असताना ठराव घेण्यात आला. या ठरावाला सूचक म्हणून आरोग्य सभापती तर अनुमोदक म्हणून माजी बांधकाम सभापती होते. आता व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एकमेकांविरोधात आघाडी उघडली आहे. भाजपातील बोटावर मोजण्या इतक्याच नगरसेवकांची कामे होतात.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv Senaशिवसेना