शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:48 IST

नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च करण्यात आला. यामुळे पालिकेची तिजोरी रिकामी झाली असून नवीन क्षेत्रात विकास कामांवर कवडीचाही खर्च न केल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे.

ठळक मुद्देतिजोरी रिकामी : नगरसेवकांनी दिला राजीनाम्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च करण्यात आला. यामुळे पालिकेची तिजोरी रिकामी झाली असून नवीन क्षेत्रात विकास कामांवर कवडीचाही खर्च न केल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे.नगरपरिषद हद्दीत लगतच्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील एक लाख ३६ हजार लोकसंख्या विलीन झाली. या क्षेत्रातील ३६ हजार मालमत्तांचाही यात समावेश आहे. या सर्व मालमत्तांचे आधीच मूल्यांकन झाले होते. तरीही पालिकेने या पुन्हा मूल्यांकन केले. त्यापोटी संबंधित खासगी कंपनीला प्रत्येकी ४७० रूपये देण्यात आले. मात्र मूल्यांकन करताना संबंधित कंपनीने ३६ हजारांऐवजी तब्बल ६३ हजार मालमत्तांचे मूल्यांकन केल्याचा अहवाल दिला.मालमत्तांचे मूल्यांकन करणाºया कंपनीने दुप्पट मालमत्ता दर्शविल्याने पालिकेवर साडे तीन कोटींचा भुर्दंड पडला. यापैकी दोन कोटींचे देयक अदा करण्यात आले. तसेच छायाचित्र अपलोड करण्यासाठी साडेचार लाख, संगणकीकृत माहिती सादर करण्यासाठी साडेचार लाख रूपये द्यावे लागणार आहे. सोबतच प्रशिक्षणावर ४५ हजारांचा खर्च करण्यात आला. बिल वाटपासाठी ८० रूपयांचे देयके आकारले गेले. हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी निविदाच रद्द करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनपालिकेच्या कारभाराविषयी बुधवारी नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. त्यातून त्यांनी निविदा रद्द न झाल्यास येत्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक दिनेश चिंडाले, बबलू देशमुख, विजय खडसे, सपना लंगोटे, वैशाली सवाई, सुषमा राऊत आदी नगरसेवक उपस्थित होते.