शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चंदन पार्कला बहरण्याआधीच लागली उधळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:40 IST

दारव्हा मार्गावरील जामवाडी शिवारात निसर्गाच्या चमत्काराने चार हजारावर चंदन वृक्ष उगवले आहेत. त्याला वनविभागाने चंदन पार्क म्हणून जाहीर केले असून तेथे संरक्षण भिंतींचे कामही सुरू आहे.

ठळक मुद्देवृक्ष सुकले : जामवाडी शिवारातील चार हजारांवर झाडांना धोका, वन विभागापुढे नवीन समस्या

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा मार्गावरील जामवाडी शिवारात निसर्गाच्या चमत्काराने चार हजारावर चंदन वृक्ष उगवले आहेत. त्याला वनविभागाने चंदन पार्क म्हणून जाहीर केले असून तेथे संरक्षण भिंतींचे कामही सुरू आहे. आता या चंदन वृक्षाला उधळी लागली असून अनेक वृक्ष भर पावसाळ््यात वाळत आहेत. या समस्येवर उपाय शोधण्याची धडपड वनविभागाची यंत्रणा करत आहे.जामवाडी येथील ग्रामस्थ दफनभूमी म्हणून वापरत असलेल्या वनविभागाच्या जागेत चंदनाची हजारो झाडे असल्याचा उलगडा दीड वर्षापूर्वी झाला. त्यानंतर या वनाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कधी काळी उमर्डा नर्सरीत मोठ्या प्रमाणात परिपक्व चंदन वृक्ष होते. हा परिसर आंतरराष्ट्रीय चंदन तस्कारांच्या रडारवर आल्याने अनमोल चंदन ठेवा पाहता पाहता नष्ट झाला. आज उमर्डा नर्सरी परिसरात अवशेषापुरतीच झाडे शिल्लक आहेत. अशा स्थिती जामवाडी शिवारात निसर्गाने निर्माण केलेल चंदन पार्क हाती लागले. त्यावरही उधळीचे आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. पाच ते सहा फूट उंचीचे झाड येथे आहेत. उधळीने साल खाल्ल्यामुळे झाड वाळत आहेत. पूर्वीची दफनभूमी असल्याने येथे उधळीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा धोका चंदन वृक्षाला होताना दिसत आहे.चंदन बनाला महामार्गाचा धोकावन विभागाची यंत्रणा या वृक्षांच्या संवर्धनासाठी आता वनस्पतीशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे. या चंदन पार्कच्या संरक्षणासाठी ४३ लाख रुपये खर्चून भिंत बांधली जात आहे. शिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नैसर्गिक देखावे निर्माण केले जाणार आहे. अगदी महामार्गाला लागूनच चंदन बन तयार झाल्याने त्याच्या संरक्षण व संवर्धनाचे आव्हान वनविभागापुढे आहे. यापूर्वी यवतमाळातून चंदन तस्करीचे प्रकार गाजले होते, हे विशेष.

टॅग्स :forest departmentवनविभाग