शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

वीज चोरी रोखण्याचे आव्हान

By admin | Updated: February 9, 2017 00:26 IST

शहरासह ग्रामीण भागातील वीज चोरी रोखण्याचे तगडे आव्हान विद्युत कंपनीसमोर आहे.

विद्युत कंपनी : आकोडे टाकून वीज पुरवठा, पथकाच्या कामगिरीवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह यवतमाळ : शहरासह ग्रामीण भागातील वीज चोरी रोखण्याचे तगडे आव्हान विद्युत कंपनीसमोर आहे. घरगुती वापरासह विविध कामांसाठी आकोडे टाकून वीज चोरी केली जात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे सर्व प्रयोग सपशेल अयशस्वी ठरले असल्याचे दिसून येत आहे. यात प्रामाणिक वीज ग्राहकांचे मात्र नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून व्यवसाय सुरू करणाऱ्यांसह झोपडीवजा घरात उजेड पडावा यासाठी चोरीची वीज वापरली जात आहे. सहज दृष्टीस पडेल अशा प्रकारे आकोडे टाकून वीज घेण्यात आलेली आहे. अपघाताची कुठलीही भीती अथवा विद्युत कंपनीकडून कारवाई होईल याची थोडीही चिंता न करता वीज चोरी होत आहे. एकीकडे नागरिकांना अनियमित वीज पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते, तर दुसरीकडे वीज चोरी सुरू आहे. वीज चोरी रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पथकाला यश कसे येत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात सहज फेरफटका मारला तरी वीज चोरी सापडू शकते. शिवाय शहरी भागात गल्लीबोळांमध्ये सुरू असलेली चोरीही उघड होते. परंतु यासाठी चांगले प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. वीज देयक नियमित भरणाऱ्या ग्राहकांकडे थोडीही रक्कम थकीत झाल्यास वीज पुरवठा तोडण्याची कारवाई केली जाते, मग वीज चोरी का पकडली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्युत कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर) उघड्या डीपी धोकादायक शहर आणि ग्रामीण भागातील उघड्या डीपी धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी तर डीपीला दरवाजाच नसल्याचे प्रकार आहे. वीज दुरुस्त केल्यानंतर डीपीचा दरवाजा चांगल्या प्रकारे लावण्याची तसदी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही. कडीकोंडे असतानाही ते पक्के लावले गेले की नाही, याची खात्री करत नाही. काही डीपी रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. एखाद्यावेळी चुकून डीपीमधील साहित्याला स्पर्श झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती आहे.