शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत ४३० कोटींच्या पीककर्ज वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST

खरीप हंगाम- २०२० मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना ५३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप केले होते. परंतु, आतापर्यंत त्यातील केवळ १०० कोटी रुपयांची वसुली होऊ शकली. आणखी ४३० कोटी रुपयांच्या पीककर्जाची वसुली होणे बाकी आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातचे गेले. तर किडीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीने दगा दिला. कित्येक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीच्या शेतात नांगर फिरवून ती उपटून फेकली.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाचा मिळणार शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आतापर्यंत केवळ शंभर कोटी रुपयांची वसुली झाली असून पुढील १५ दिवसांत उर्वरित ४३० कोटी रुपयांच्या पीककर्ज वसुलीचे आव्हान बँकेपुढे राहणार आहे. खरीप हंगाम- २०२० मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना ५३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप केले होते. परंतु, आतापर्यंत त्यातील केवळ १०० कोटी रुपयांची वसुली होऊ शकली. आणखी ४३० कोटी रुपयांच्या पीककर्जाची वसुली होणे बाकी आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातचे गेले. तर किडीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीने दगा दिला. कित्येक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीच्या शेतात नांगर फिरवून ती उपटून फेकली. उत्पन्नच न झाल्याने पीककर्ज भरावे कसे, अशा विवंचनेत शेतकरी आहे. कित्येक शेतकऱ्यांचा लागवडखर्चही निघू शकलेला नाही. काहींना दुबार पेरणीसाठी खासगी सावकारांकडून पैशाची तजवीज करावी लागली होती. मात्र, ही दुबार पेरणीही उलटली. एकूणच शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा स्थितीत त्याच्याकडून ४३० कोटी रुपयांच्या पीककर्जाची वसुली करण्याचे मोठे आव्हान बँकेपुढे आहे. मात्र, अनेक शेतकरी मार्चअखेरीसच पीक कर्जाची रक्कम भरतात. त्यामुळे कर्जाची वसुली होईल, असा दावा बँक व्यवस्थापनाकडून केला जात आहे. त्यासाठी गेल्यावर्षीच्या कर्ज वसुलीचा दाखला दिला जात आहे. खरीप हंगाम- २०१९ मध्ये जिल्हा बँकेने ४८० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप केले होते. त्यापैकी ४१० कोटींच्या कर्जाची वसुली झाल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज भरल्यास त्यांना शासनाच्या शून्य टक्के व्याजदराच्या योजनेचा लाभ मिळणार असून पुढील वर्षीच्या कर्जासाठी ते पात्र ठरणार आहे. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते. बँकेने पीक कर्जाशिवाय इतरही कर्ज वितरीत केले आहे. त्यातील दीडशे कोटी रुपये थकीत आहे. पैकी टॉप दीडशे प्रकरणांतील शंभर कोटींच्या वसुलीवर अधिक जोर दिला जात आहे. सध्या जिल्हा बँकेचा ‘एनपीए’ २९ टक्क्यांवर आला आहे. मात्र, त्यात ९० टक्के रक्कम ही पीककर्जाचीच असल्याचे सांगितले जाते. हा ‘एनपीए’ आणखी कमी करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.  ५० हजारांच्या माफीबाबत अद्याप आदेश नाहीत  नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत माफीचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपीय पत्रपरिषदेत नुकतीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, याबाबत अद्याप प्रत्यक्ष कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे बँकेतून सांगण्यात आले. ही घोषणा सभागृहाबाहेर केली गेली आहे. शिवाय, बजेटमध्ये या मुद्यावर तरतूद केली गेली नाही. त्यामुळे ५० हजारांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल का आणि त्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल याबाबत सहकार क्षेत्रात साशंकता व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी