शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

कळंब बाजार समितीच्या सक्षमतेचे संचालकांपुढे आव्हान

By admin | Updated: November 11, 2016 02:14 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु यापूर्वी बाजार समितीने शेतकऱ्यांऐवजी व्यापाराचे हीत जोपासले.

पूर्वी होते व्यापाऱ्यांचेच हित : पाच वर्षांत उत्पन्नात मोठी घसरणकळंब : शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु यापूर्वी बाजार समितीने शेतकऱ्यांऐवजी व्यापाराचे हीत जोपासले. त्यामुळे बाजार समिती डबघाईस आली. आता समितीला सक्षम करण्याचे मोठे आव्हान नवीन संचालक मंडळापुढे उभे ठाकले आहे. मागील पाच वर्षामध्ये बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली. पूर्वी व्यापारी मंडळी खासगीमध्ये परस्पर शेतमाल खरेदी करायचे. परिणामी बाजार समितीचा सेस बुडविला जायचा. मागील वर्षी १९ ते २० हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच १८ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीचा उच्चांक गाठला. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केली जात आहे. यावरुन खासगी शेतमाल खरेदीत प्रामाणिकपणे अटकाव केल्याचे दिसून येते. असे असले तरी बाजार समितीला उतरती कळा थोपवून त्यात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. दोन डझनापेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी नोंद आहे. परंतु हर्रासवर केवळ दोन ते चारच व्यापारी बोलीसाठी हजर असतात. हर्रासावरील व्यापाऱ्यांची संख्या वाढविल्यास याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. मागील पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करीत केवळ बांधकाम व कर्मचारी भरतीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी असलेला शिदोरी मंडप अजूनही नावापुरताच आहे. तेथेही सुविधा निर्माण कराव्या लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)