शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बोगस बियाणे पकडण्याचे आव्हान

By admin | Updated: May 24, 2014 00:14 IST

खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्‍यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती

१६ भरारी पथके : टोल फ्री क्रमांकावर नोंदविली जाणार तक्रार

यवतमाळ : खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्‍यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. सर्वाधिक क्षेत्र सोयाबिनखाली असण्याचा अंदाज आहे. असे असले तरी जिल्ह्याला लागणार्‍या बियाण्यांपैकी ३० टक्के बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे. या स्थितीत बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारली जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भरारी पथकांवर मोठी जबाबदारी असणार आहे. बाजारपेठत आलेले बियाणे भेसळयुक्त निकृष्टदर्जाचे तर नाही ना, याची चाचपणी त्यांना करावी लागणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रांतील बियाण्यांचे नमुने घेण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहे. पेरणीपूर्वीच या नमुन्यांचा अहवाल मिळणार आहे. परंतु या कालावधित बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या घरांपर्यंत पोहचण्याचीही दाट शक्यता आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोळा तालुक्यांतील भरारी पथकांना सतर्क राहावे लागेल. त्या अनुषंगाने ४८ कर्मचार्‍यांची नियुक्ती या पथकांमध्ये करण्यात आली आहे. पथकप्रमुखांचा क्रमांकही शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. तसेच इतर कुणालाही बोगस बियाण्यासंबंधी कोणतीही माहिती असल्यास ती या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या कालावधित तक्रार नोंदवायची असल्यास १८०० २३३ ४००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने केले आहे. (शहर वार्ताहर)