शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे पकडण्याचे आव्हान

By admin | Updated: May 24, 2014 00:14 IST

खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्‍यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती

१६ भरारी पथके : टोल फ्री क्रमांकावर नोंदविली जाणार तक्रार

यवतमाळ : खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्‍यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. सर्वाधिक क्षेत्र सोयाबिनखाली असण्याचा अंदाज आहे. असे असले तरी जिल्ह्याला लागणार्‍या बियाण्यांपैकी ३० टक्के बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे. या स्थितीत बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारली जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भरारी पथकांवर मोठी जबाबदारी असणार आहे. बाजारपेठत आलेले बियाणे भेसळयुक्त निकृष्टदर्जाचे तर नाही ना, याची चाचपणी त्यांना करावी लागणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रांतील बियाण्यांचे नमुने घेण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहे. पेरणीपूर्वीच या नमुन्यांचा अहवाल मिळणार आहे. परंतु या कालावधित बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या घरांपर्यंत पोहचण्याचीही दाट शक्यता आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोळा तालुक्यांतील भरारी पथकांना सतर्क राहावे लागेल. त्या अनुषंगाने ४८ कर्मचार्‍यांची नियुक्ती या पथकांमध्ये करण्यात आली आहे. पथकप्रमुखांचा क्रमांकही शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. तसेच इतर कुणालाही बोगस बियाण्यासंबंधी कोणतीही माहिती असल्यास ती या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या कालावधित तक्रार नोंदवायची असल्यास १८०० २३३ ४००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने केले आहे. (शहर वार्ताहर)