शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

सीईटी रद्द, पण नव्या निर्णयापूर्वीच जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 21:50 IST

राज्य शासनाकडून ज्या काही नव्या गाईड लाईन येतील, त्यानुसारच अकरावीचे प्रवेश दिले जातील, अशी भूमिका शिक्षणाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. परंतु, प्रत्यक्षात निर्णयाची वाट न पाहता पालक महाविद्यालयांमध्ये धाव घेत आहेत. जिल्ह्यात दहावीचे ३७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अकरावीच्या तब्बल ३९ हजार जागा उपलब्ध असल्याने प्रवेश मिळण्याबाबत कोणतीही अडचण नाही. परंतु, दहावीचा भरघोस निकाल बघता सर्वांनाच मनाप्रमाणे महाविद्यालय मिळेल का, याबाबत साशंकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने घोषित केलेली सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द ठरविली. आता अकरावी प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने राबवावी, याबाबत राज्य मंत्रिमंडळाचा खल सुरू आहे. पण शासनाचा नवा निर्णय येण्यापूर्वीच जिल्ह्यात ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रियाही गुपचूप सुरू झाल्याचे चित्र आहे.राज्य शासनाकडून ज्या काही नव्या गाईड लाईन येतील, त्यानुसारच अकरावीचे प्रवेश दिले जातील, अशी भूमिका शिक्षणाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. परंतु, प्रत्यक्षात निर्णयाची वाट न पाहता पालक महाविद्यालयांमध्ये धाव घेत आहेत. जिल्ह्यात दहावीचे ३७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अकरावीच्या तब्बल ३९ हजार जागा उपलब्ध असल्याने प्रवेश मिळण्याबाबत कोणतीही अडचण नाही. परंतु, दहावीचा भरघोस निकाल बघता सर्वांनाच मनाप्रमाणे महाविद्यालय मिळेल का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळेच शासनाचा सुधारित निर्णय येईल तेव्हा येईल, पण आतापासूनच आपली ॲडमिशन पक्की करून ठेवावी, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. तर आपली पटसंख्या टिकून राहावी, यासाठी ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांनी आताच ‘गुपचूप’ ॲडमिशन सुरू केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जागा भरपूर असल्यातरी सर्वांना यवतमाळ, वणी, पुसद अशा मोठ्या शहरांमध्ये महाविद्यालयातच प्रवेश हवे आहे. त्यामुळे काही दिवसांनी गर्दी होईल, या भीतीपायी आतापासूनच प्रवेश देण्याची घाई पालकांकडून केली जात आहे. तर ग्रामीण भागातील महाविद्यालये विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु यापूर्वी शिक्षण विभागाने दिलेले  ‘सीईटीशिवाय प्रवेश नको’  हे आदेश आता बासनात गेले आहे. तर पालकही शासनाच्या नव्या आदेशाची वाट पहायला तयार नाही. 

विद्यार्थ्यांचे नुकसान नाही - शिक्षणाधिकारी नव्या गाईड लाइन येण्यापूर्वीच महाविद्यालयांनी प्रवेश देणे सुरू केल्याबाबत अद्यापतरी आमच्याकडे माहिती नाही. मात्र काही महाविद्यालयांनी दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश सुरू केले असतील, तर अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.  महाविद्यालयांनी क्षमतेऐवढेच प्रवेश द्यावे.                  - दीपक चवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ

प्राचार्य म्हणतात, स्पर्धा वाढली 

आता प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी खुली झाल्याची पालकांची भावना आहे. पालक प्रवेशासाठी आमच्याकडे गर्दी करीत आहे. मात्र दहावीचे बहुतांश विद्यार्थी ९० टक्क्यावर गुण मिळविणारे ठरले. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा आहे.     - प्राचार्य साक्षी बनारसेरामभाऊ ढोले महाविद्यालय, यवतमाळ  

न्यायालयाने विद्यार्थी हितासाठी जरी सीईटी रद्द केली आहे, तरी याचा परिणाम अकरावी प्रवेशाबाबत नक्कीच पहायला मिळणार आहे. कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी राज्य शासनाने घ्यावी.-प्राचार्य लीना बैसगुरूकुल काॅलेज, जवळा 

विद्यार्थी चिंतेत 

दहावीत अपेक्षित गुण न मिळाल्याने सीईटीत प्राविण्य मिळवून आवडती शाखा मिळविण्यासाठी आशा निर्माण झाली होती. पण आता सीईटीही रद्द झाली. त्यामुळे काळजी वाटत आहे.- श्रृष्टी कांदेकर, विद्यार्थिनी

काही विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले आहे. त्यामुळे आवडत्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी त्यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. नंतर सीईटीत गाळणी झाली असती. पण सीईटी रद्द झाली. आता स्पर्धा वाढणार आहे.  - तनुश्री नडपेलवार, विद्यार्थिनी     

 

टॅग्स :collegeमहाविद्यालय