शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सचिवांनी घेतली वंडलीची ग्रामसभा

By admin | Updated: April 22, 2016 04:31 IST

तालक्यातील वंडली येथे ‘ग्राम उदय ते भारत उदय’ या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे

कळंब : तालक्यातील वंडली येथे ‘ग्राम उदय ते भारत उदय’ या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय उपसचिव एम. आय. वाडवाणी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा मांढरे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक बी. डब्ल्यू. चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, तालुका कृषी अधिकारी के. बी. आठवले आदी उपस्थित होते. के. बी. आठवले, डॉ. मनोहर नाल्हे व पद्माकर मडावी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.यावेळी उपसचिव एम. आय. वाडवाणी यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला. तो कुठे खर्च करण्यात आला. निधी खर्च करताना गावकऱ्यांना विश्वासात घेतले जावे. गावात स्वच्छता असली पाहिजे. शौचालय बांधकाम करुन ते वापरले पाहिजे. गाव निर्मलग्राम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी संदीप अपार म्हणाले, शासनाच्या विविध योजना आहे. या योजनांची माहिती सांगणे जसे शासकीय कर्मचाऱ्यांचे काम आहे, तसे जनतेनेही जागृत असले पाहिजे. दिल्लीत बसून योजनांची आखणी करणारे अधिकारी गावपातळीवर येऊन माहिती घेत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व योजना लोकाभिमुख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर यांनी प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली. संचालन प्रसेनजित पाटील यांनी केले. तर आभार पद्माकर मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला उपसरपंच नंदा पारीसे, विस्तार अधिकारी रमेश केळकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, कृषी विस्तार अधिकारी पंकज बरडे, मुख्याध्यापक गिरीधर ससनकर, ग्रामसेवक प्रवीण सदावर्ते, मंडळ कृषी अधिकारी गुल्हाने, मंडळ अधिकारी पंचबुद्धे, श्याम कामटकर, स्मिता ढोले, तलाठी तलवारे, शिक्षक बेलखेडे आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)खते, बि-बियाणांचा काळाबाजार४शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहे, पण त्यांची माहिती दिली जात नाही. खते, बि-बियाणे चढ्या भावाने विकली जाते. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे यात शेतकरी वर्ग भरडला जातो, अशी तक्रार काही युवा शेतकऱ्यांनी उपसचिवांपुढे केली. यावर त्यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.