शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातच खचले सिमेंट बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:58 IST

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे शासनाने हाती घेतली आहे.

सोनखास-उत्तरवाढोणा परिसर : दुष्काळापासून मुक्ती ठरतेय दिवास्वप्न लोकमत न्यूज नेटवर्क सोनखास : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे शासनाने हाती घेतली आहे. परंतु नेर तालुक्यात ज्या पद्धतीन ेवर्षभरातच सिमेंट बंधारे खचले आहेत ते पाहता दुष्काळ व पाणीटंचाईपासून मुक्तीचा संकल्प हा दिवास्वप्नच ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा परिसरात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तालुक्यातील आठ गावांचा जलयुक्त शिवारमध्ये समावेश करण्यात आला आहे. उत्तरवाढोणा येथे नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच सिमेंट बंधाऱ्याची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. परंतु सिमेंट बंधाऱ्याची कामे एका वर्षातच खचत असल्याने शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी, कंत्राटदार, अधिकारी आदींच्या संगनमतातून ही कामे करण्यात आली आहेत. परंतु अतिशय निकृष्ट दर्जाची कामे झाल्यामुळे वर्षभरातच हे सिमेंट बंधारे पूर्णपणे खचल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार या नावीण्यपूर्ण योजनेतून जलसंधारणाअंतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनांची कामे केली जाणार असून २०१९ पर्यंत संपूर्ण तालुक्यातील दुष्काळ व पाणीटंचाई संपविण्याचा शासनाचा संकल्प आहे. सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांमध्ये ज्याप्रमाणे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले त्यावरून इतरही कामांचा अंदाज यावा, केवळ वेळेच्या आत कामे करून कागदपत्र ओके केले जात आहे. प्रत्यक्षात या योजनेमागील शासनाचा हेतू त्यातून साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांना आढळून येणाऱ्या या बाबी संबंधित शासकीय विभागांच्या वरिष्ठांना का दिसत नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षापासून उत्तरवाढोणा परिसरात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे अभियान नावापुरतेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशाच पद्धतीने या पुढीलही कामे झाल्यास दुष्काळमुक्ती आणि शेतीला पाणी हा शासनाचा मूळ हेतू यातून साध्य होईल, असे दिसत नाही.