शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या ट्रकचे मध्य प्रदेशात दोन तर आंध्रात मिळतात १५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 10:22 IST

७० जनावरांचा ट्रक मध्यप्रदेशात अवघ्या दोन लाखात मिळतो. परंतु याच ट्रकचे तेलंगणा-आंध्रप्रदेशात १५ ते १६ लाख रुपये मिळतात. ‘एमआयएम’च्या यवतमाळ शहर अध्यक्षाने बुधवारी पत्रपरिषदेत हा हिशेब मांडताना जनावर तस्करीच्या मार्गावरील पोलिसांचे लागेबांधेही उघड केले.

ठळक मुद्दे‘एमआयएम’ने मांडला हिशेब तस्करीचा सूत्रधार नागपुरातप्रत्येकच पोलीस ठाणे ‘लाभार्थी’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ७० जनावरांचा ट्रक मध्यप्रदेशात अवघ्या दोन लाखात मिळतो. परंतु याच ट्रकचे तेलंगणा-आंध्रप्रदेशात १५ ते १६ लाख रुपये मिळतात. ‘एमआयएम’च्या यवतमाळ शहर अध्यक्षाने बुधवारी पत्रपरिषदेत हा हिशेब मांडताना जनावर तस्करीच्या मार्गावरील पोलिसांचे लागेबांधेही उघड केले.सोमवारी यवतमाळातील पांढरकवडा रोडवर जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटला होता. त्यात १६ जनावरांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ‘एमआयएम’वर पाठलाग केल्याचा आरोप गोवंश रक्षक संघटनांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’चे यवतमाळ शहराध्यक्ष शाज अहमद यांनी येथे पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, मध्यप्रदेशात गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे तेथे कवडीमोल भावात जनावरे मिळतात. तेथील शेतातून जनावर तस्करीचा हा व्यवसाय चालतो. दीड ते दोन लाखात जनावरांचा ट्रक मिळतो. त्यात ६८ ते ७० जनावरे कोंबलेली असतात. हाच ट्रक आंध्रप्रदेशात सुखरुप पोहोचल्यास व त्यातील जनावरे जीवंत राहिल्यास या ट्रकला १५ ते १६ लाख रुपये भाव मिळतो.

आर्णी-लोणबेहळ प्रमुख मार्गजनावर तस्करीचे हे बहुतांश ट्रक आर्णी-लोणबेहळ मार्गे तेलंगणा-आंध्रप्रदेशात पोहोचतात. पोलिसांना खरोखरच जनावर तस्करी बंद करायची असेल तर या एका मार्गावर प्रामाणिकपणे तपासणी करणे गरजेचे आहे. राष्टय महामार्ग क्र. ७ वरूनसुद्धा अनेकदा पळवाटा शोधून ट्रक पास होतात. मध्यप्रदेशातून निघणारा जनावरांचा ट्रक आपल्या या मार्गातील सर्व पोलीस ठाण्यांना पैसे वाटत सुटतो. या तस्करांशी पोलिसांचे लागेबांधे असून तस्करीच्या मार्गावरील बहुतांश पोलीस ठाणे ‘लाभार्थी’ आहेत. अनेक ठिकाणी वरिष्ठांचाही त्यात सहभाग राहत असावा अशी शंकाही ‘एमआयएम’ने व्यक्त केली.

सूत्रधाराचा एलसीबीत तळ‘एमआयएम’च्या सांगण्यानुसार, जनावर तस्करीतील मुख्य सूत्रधार हा नागपुरातील रहिवासी आहे. सोमवारी पांढरकवडा रोडवर अपघाताची घटना घडल्यानंतर हा सूत्रधार दुपारी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात बसून होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास त्याची ही बैठक सिद्ध होईल. आरटीओ चेक पोस्ट, महामार्ग पोलीस, यवतमाळ ग्रामीण, कळंब, यवतमाळ शहर, वडगाव रोड, आर्णी, एलसीबी असे सर्वच प्रमुख पोलीस ठाणे जनावर तस्करांना ‘मॅनेज’ आहेत. आपल्या हद्दीतून वाहन पास करून देण्यासाठी त्यांना ‘लाभ’ मिळतो.

कळंब तस्करीचे मुख्य केंद्रयेथील कळंब परिसर हा जनावर तस्करीचे मुख्य केंद्र आहे. तेथील शेतांमध्ये एकावेळी ४०० ते ५०० जनावरे राहतात. अनेकदा स्थानिक पातळीवरून ट्रक भरुन ते पुढे हैदराबादला पाठविले जातात. जनावरांच्या या तस्करीतूनच रात्रीचे अपघात वाढले आहेत. वाहन चोरी, जनावर चोरींच्या घटनाही वाढल्या आहेत.तस्करीत आड येणाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. मलासुद्धा धमकी दिल्याचा आरोप शाज अहेमद यांनी केला. नागपूरवरून आलेल्या तीन तस्करांना आपण पकडून दिले. परंतु यवतमाळ शहर पोलिसांनी त्यांना कोणत्याही कारवाईशिवाय सोडून दिल्याचा आरोप एमआयएमने केला. पत्रपरिषदेला शाहबाज अहेमद, शेख साजीद व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विहिप-बजरंग दलाला आव्हानविहिप-बजरंग दलाचे कार्यकर्ते गोवंश रक्षक म्हणून वावरत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचेही हितसंबंध असण्याची शक्यता पत्रपरिषदेत वर्तविण्यात आली. विहिप-बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना खरोखरच जनावर तस्करी थांबवायची असेल तर त्यांनी आपल्या सोबत यावे, आपण त्यांना अवैध कत्तलखाने, तस्करीचे रॅकेट व एकूणच माहिती देऊ, असे खुले आव्हान एमआयएमचे शहराध्यक्ष शाज अहेमद यांनी पत्रपरिषदेत दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा