शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

नरभक्षक वाघीण कैद, इतर वाघांनाही पकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

पांढरकवडा विभागात नरभक्षक वाघिणीची प्रचंड दहशत होती. तिने सहा जनावरांची शिकार केली. तिच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. या वाघिणीला पकडण्यासाठी नागरिकांमधून वन खात्यावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता. अखेर मेळघाटातील विशेष कृती दलाची मदत घेऊन बुधवारी सकाळी ही वाघीण १०.३० वाजता बेशुद्ध करून पकडण्यात आली.

ठळक मुद्देगावकऱ्यांचे साकडे : २७ ट्रॅप कॅमेरांनी टिपले

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : पांढरकवडा तालुक्यात मानव व प्राण्यांची शिकार करून धुमाकूळ घालणाºया वाघिणीला वन विभागाने पकडण्यात यश मिळविले. त्यासोबतच टिपेश्वर अभयारण्याच्या बाहेर इतर वाघांचा मुक्त संचार असल्याने त्यांच्यापासून गावकऱ्यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे या फिरणाऱ्या वाघांनाही जेरबंद करावे यासाठी बुधवारी गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना साकडे घातले.पांढरकवडा विभागात नरभक्षक वाघिणीची प्रचंड दहशत होती. तिने सहा जनावरांची शिकार केली. तिच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. या वाघिणीला पकडण्यासाठी नागरिकांमधून वन खात्यावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता. अखेर मेळघाटातील विशेष कृती दलाची मदत घेऊन बुधवारी सकाळी ही वाघीण १०.३० वाजता बेशुद्ध करून पकडण्यात आली. या वाघिणीला शोधण्यासाठी जंगलात वन विभागाने तब्बल २७ ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यात ती कैद झाली आणि पकडली गेली. वृद्धेची शिकार केल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसात या वाघिणीला जीवंत पकडण्यात वन खात्याला यश आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड, आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वन खात्याच्या कामगिरीचे कौतुक केले.गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी परिसरात हल्लेखोर वाघिणीसह अनेक वाघांचा मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरात फिरणाऱ्या सर्वच वाघांना वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी बुधवारी पांढरकवडा वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक एस.आर.दुमोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुभाष कायतवार यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, वाघाच्या दहशतीमुळे शेतीकाम ठप्प पडले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. याचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, मजुरीची कामे ठप्प पडली असून मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.बुधवारी पकडल्या गेलेल्या वाघिणीची नागपूर येथील अस्थाई उपचार केंद्रात रवानगी करण्यात आली. ही नरभक्षक गावात जाऊ नये म्हणून सात किलोमीटर क्षेत्राला चेनलिंग फेन्सींग करण्यात आले होते.गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी परिसरात हल्ले करित असलेल्या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश २१ सप्टेंबरला प्राप्त झाले. त्यानुसार युद्धपातळीवर हल्लेखोर वाघिणीचा शोध घेऊन तिला पकडण्यात आले आहे. यामुळे तूर्तास वाघ-मानव संघर्षाला पुर्णविराम मिळाला आहे.- एस.आर.दुमोरेउपवनसंरक्षक, पांढरकवडा

टॅग्स :forestजंगल