शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हद्दवाढीतील नागरिक रस्त्याविना घरातच ‘कैद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:02 IST

रस्त्याविना वर्षभर हाल भोगणारे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिक सध्या दिवसभर सुरू असलेल्या पावसाने घरातच ‘कैद’ झाले आहेत. पाय फसणाऱ्या रस्त्यावरून गाडी तर काय पायी चालणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देपालिकेचे दुर्लक्ष : लोहारा, वाघापूर, वडगाव, उमरसरा, भोसा परिसरात संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्याविना वर्षभर हाल भोगणारे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिक सध्या दिवसभर सुरू असलेल्या पावसाने घरातच ‘कैद’ झाले आहेत. पाय फसणाऱ्या रस्त्यावरून गाडी तर काय पायी चालणेही कठीण झाले आहे. लोहारा, वाघापूर परिसरातील विविध नव्या वसाहतींमधील हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. यासह भोसा, उमरसरा, वडगाव ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील वसाहतींच्या समस्याही दुर्लक्षित आहेत.या ग्रामपंचायती साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वी यवतमाळ नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. परंतु, ज्या विकासाच्या अपेक्षेने या ग्रामपंचायती पालिकेत विलीन झाल्या, तो विकास काही हद्दवाढ क्षेत्रात अवतरलेला नाही. या परिसरात रस्त्याची परिस्थिती सर्वात गंभीर झाली आहे.प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनेक नव्या वसाहती वसल्या आहेत. येथील वैभवनगर, सूर्योदयननगर, शुभम कॉलनी, सानेगुरुजी नगर, जिरापुरे ले-आऊट, चिंतामणीनगर, राधाकृष्णनगरी, सिद्धेश्वरनगर, गोकुलनगरी, प्रिया रेसिडेन्सी आदी भागात मुळात रस्त्याच्या नावावर केवळ मातीचे ढिग आहे. ते आता पावसाने चिखल आणि घाणीत रुपांतरीत झाले आहेत. सानेगुरुजीनगरसह वैभवनगरातील लोक तर जाता येता घसरून पडत आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पाऊस सुरू असेपर्यंत आणि पाऊस थांबल्यावर आठ-दहा तास घराबाहेर न पडणेच पसंत केले आहे. या परिसरातील नगरसेवकांचेही प्रचंड दुर्लक्ष होत आहे.भोसा परिसरात रस्त्यावरून गटार वाहताना दिसते. उमरसरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेने दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र निधी नसल्याने काम थंडबस्त्यात असल्याचे सांगितले जाते.प्रभाग क्रमांक १३ मधील रस्ते अतिशय चांगले आहे, असे नगरपालिकेला वाटत असेल तर पालिकेने येथील नागरिकांकडून टोल तरी वसूल करावा आणि आपले उत्पन्न वाढवावे, अशी खोचक टीका लोहारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तुषार देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस