शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
2
निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
3
...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
4
"पालिका निवडणुकांसाठी शेअर बाजार बंद ठेवणं खराब नियोजनाचं लक्षण," का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
6
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
7
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: "आमचा विजय निश्चित, विरोधी पक्ष उद्या काय सांगायचे? याची प्रॅक्टिस करतायेत" - फडणवीस
8
Fitness Tips: जिमच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या 'या' ७ चुका आजच थांबवा!
9
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
10
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मोदी सरकार देतंय ९० हजारांचे कर्ज; अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
11
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
12
भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
13
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
14
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
15
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
16
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
17
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
18
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
19
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
20
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे.

ठळक मुद्देराळेगाव विधानसभा : २५ वर्षांपासून त्याच त्या उमेदवाराचा वीट

के.एस. वर्र्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी सर्व प्रयत्न करूनही अपयशी ठरलेले इच्छुक निवडणूक काळात दिसेनासे झाले होते. अपवाद वगळताच इच्छुकाचा चेहरा झळकत होता. राळेगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून १२ जणांनी मोर्चेबांधणी केली होती. मागील २५ वर्षांपासून एकखांबी तंबू राहिलेल्या नेत्याने पक्षाचे तिकीट तर आणले पण त्यांना विजय मात्र मिळविता आला नाही.राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी निवडणुकीची तयारी केली. मतदारसंघात लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला. प्रसंगी आंदोलने केली केली. कधीतरी संधी मिळेल या आशेपोटी त्यांचे हे कार्य सुरू राहिले. पक्षाने मात्र त्यांची प्रत्येकवेळी निराशा केली.यावेळच्या विधानसभेसाठी पक्षाकडे १२ उमेदवारांनी अर्ज केले होते. नवीन चेहरा या मतदार संघात दिला जाईल, असे वातावरण शेवटपर्यंत होते. मात्र अखेरच्या क्षणी प्रा.वसंत पुरके हे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेण्यात यश आले नाही. तिकीट मागणाऱ्यांमधील अपवादात्मक चेहराच प्रचार करताना दिसत होता.गत पाच वर्षात प्रा. पुरके यांच्याकडे कधी ऐकेकाळी असलेल्या एंबडवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या शक्तीशिवाय दुसरे कार्यकर्ते नव्हते, ही वस्तूस्थिती होती. ही शक्ती आणि ठेकेदारांची शक्ती वजा जाता प्रा. पुरके यांच्याकडे पुर्वी कधी सोबत असणारे जिवाभावाचे कार्यकर्ते कधीच दूर झाले होते.सरलेल्या काळात त्यांचे सहकाºयांशी वेळोवेळी मतभेद झालेले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम प्रा. पुरके यांना विजयापासून दूर ठेवण्यात झाला, असे सांगितले जाते.नेत्यांच्या भूमिकेचाही फटकाकळंब तालुक्यातील प्रवीण देशमुख, राळेगावातील प्रफुल्ल मानकर यांचा गट कधी राष्ट्रवादीत, कधी काँग्रेसमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, लोकसभा, विधानसभा निवडणुकात विरोधात लढला आहे. यात अनेक कार्यकर्ते जिंकले, अनेक हरले. हरलेल्यांचा पैसा, वेळ, श्रम गेले. शस्त्रुत्व आले. नेत्यांचे रंग बदलने अनेक कार्यकर्त्यांना पटले नाही. त्यांनी स्वस्थ बसणे किंवा भाजपकडे वळणे पसंत केले. त्यामुळेच कळंबमध्ये शक्ती असूनही काँग्रेसला कमी तर भाजपला अधिक मते मिळाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक