शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे.

ठळक मुद्देराळेगाव विधानसभा : २५ वर्षांपासून त्याच त्या उमेदवाराचा वीट

के.एस. वर्र्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी सर्व प्रयत्न करूनही अपयशी ठरलेले इच्छुक निवडणूक काळात दिसेनासे झाले होते. अपवाद वगळताच इच्छुकाचा चेहरा झळकत होता. राळेगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून १२ जणांनी मोर्चेबांधणी केली होती. मागील २५ वर्षांपासून एकखांबी तंबू राहिलेल्या नेत्याने पक्षाचे तिकीट तर आणले पण त्यांना विजय मात्र मिळविता आला नाही.राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी निवडणुकीची तयारी केली. मतदारसंघात लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला. प्रसंगी आंदोलने केली केली. कधीतरी संधी मिळेल या आशेपोटी त्यांचे हे कार्य सुरू राहिले. पक्षाने मात्र त्यांची प्रत्येकवेळी निराशा केली.यावेळच्या विधानसभेसाठी पक्षाकडे १२ उमेदवारांनी अर्ज केले होते. नवीन चेहरा या मतदार संघात दिला जाईल, असे वातावरण शेवटपर्यंत होते. मात्र अखेरच्या क्षणी प्रा.वसंत पुरके हे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेण्यात यश आले नाही. तिकीट मागणाऱ्यांमधील अपवादात्मक चेहराच प्रचार करताना दिसत होता.गत पाच वर्षात प्रा. पुरके यांच्याकडे कधी ऐकेकाळी असलेल्या एंबडवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या शक्तीशिवाय दुसरे कार्यकर्ते नव्हते, ही वस्तूस्थिती होती. ही शक्ती आणि ठेकेदारांची शक्ती वजा जाता प्रा. पुरके यांच्याकडे पुर्वी कधी सोबत असणारे जिवाभावाचे कार्यकर्ते कधीच दूर झाले होते.सरलेल्या काळात त्यांचे सहकाºयांशी वेळोवेळी मतभेद झालेले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम प्रा. पुरके यांना विजयापासून दूर ठेवण्यात झाला, असे सांगितले जाते.नेत्यांच्या भूमिकेचाही फटकाकळंब तालुक्यातील प्रवीण देशमुख, राळेगावातील प्रफुल्ल मानकर यांचा गट कधी राष्ट्रवादीत, कधी काँग्रेसमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, लोकसभा, विधानसभा निवडणुकात विरोधात लढला आहे. यात अनेक कार्यकर्ते जिंकले, अनेक हरले. हरलेल्यांचा पैसा, वेळ, श्रम गेले. शस्त्रुत्व आले. नेत्यांचे रंग बदलने अनेक कार्यकर्त्यांना पटले नाही. त्यांनी स्वस्थ बसणे किंवा भाजपकडे वळणे पसंत केले. त्यामुळेच कळंबमध्ये शक्ती असूनही काँग्रेसला कमी तर भाजपला अधिक मते मिळाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक