शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे.

ठळक मुद्देराळेगाव विधानसभा : २५ वर्षांपासून त्याच त्या उमेदवाराचा वीट

के.एस. वर्र्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी सर्व प्रयत्न करूनही अपयशी ठरलेले इच्छुक निवडणूक काळात दिसेनासे झाले होते. अपवाद वगळताच इच्छुकाचा चेहरा झळकत होता. राळेगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून १२ जणांनी मोर्चेबांधणी केली होती. मागील २५ वर्षांपासून एकखांबी तंबू राहिलेल्या नेत्याने पक्षाचे तिकीट तर आणले पण त्यांना विजय मात्र मिळविता आला नाही.राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी निवडणुकीची तयारी केली. मतदारसंघात लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला. प्रसंगी आंदोलने केली केली. कधीतरी संधी मिळेल या आशेपोटी त्यांचे हे कार्य सुरू राहिले. पक्षाने मात्र त्यांची प्रत्येकवेळी निराशा केली.यावेळच्या विधानसभेसाठी पक्षाकडे १२ उमेदवारांनी अर्ज केले होते. नवीन चेहरा या मतदार संघात दिला जाईल, असे वातावरण शेवटपर्यंत होते. मात्र अखेरच्या क्षणी प्रा.वसंत पुरके हे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेण्यात यश आले नाही. तिकीट मागणाऱ्यांमधील अपवादात्मक चेहराच प्रचार करताना दिसत होता.गत पाच वर्षात प्रा. पुरके यांच्याकडे कधी ऐकेकाळी असलेल्या एंबडवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या शक्तीशिवाय दुसरे कार्यकर्ते नव्हते, ही वस्तूस्थिती होती. ही शक्ती आणि ठेकेदारांची शक्ती वजा जाता प्रा. पुरके यांच्याकडे पुर्वी कधी सोबत असणारे जिवाभावाचे कार्यकर्ते कधीच दूर झाले होते.सरलेल्या काळात त्यांचे सहकाºयांशी वेळोवेळी मतभेद झालेले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम प्रा. पुरके यांना विजयापासून दूर ठेवण्यात झाला, असे सांगितले जाते.नेत्यांच्या भूमिकेचाही फटकाकळंब तालुक्यातील प्रवीण देशमुख, राळेगावातील प्रफुल्ल मानकर यांचा गट कधी राष्ट्रवादीत, कधी काँग्रेसमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, लोकसभा, विधानसभा निवडणुकात विरोधात लढला आहे. यात अनेक कार्यकर्ते जिंकले, अनेक हरले. हरलेल्यांचा पैसा, वेळ, श्रम गेले. शस्त्रुत्व आले. नेत्यांचे रंग बदलने अनेक कार्यकर्त्यांना पटले नाही. त्यांनी स्वस्थ बसणे किंवा भाजपकडे वळणे पसंत केले. त्यामुळेच कळंबमध्ये शक्ती असूनही काँग्रेसला कमी तर भाजपला अधिक मते मिळाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक