शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

निमंत्रण रद्दने वाङ्मयीन विचारांना काळीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:22 IST

अर्ध्या शतकानंतर यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले. या संमेलनाच्या उद्घाटकांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करून वाङ्मयीन चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे, असा आरोप राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देमाजी शिक्षणमंत्री वसंत पुरके : साहित्य संमेलन आयोजकांची भूमिका सांगकाम्याची

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अर्ध्या शतकानंतर यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले. या संमेलनाच्या उद्घाटकांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करून वाङ्मयीन चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे, असा आरोप राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.साहित्य संमेलनाचा आयोजक हा सांगकाम्याच्या भूमिकेत असतो. ऐनवेळी उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करून या संमेलनाला निमंत्रित असलेल्या सर्वच मान्यवर साहित्यिकांचा अपमान झाला आहे. जागतिकस्तरावर साहित्य जाती, धर्म, काळ, स्थळाच्या अतित असते. ते कुणाच्या दडपणाखाली येत नाही. मानवी मूल्यांचे संवर्धन करणे आणि मानव जातीत रुजवणे हेच महत्त्वाचे कार्य आहे. साहित्यिक ही जगाची ‘थिंक टँक’ आहे. समाजाच्या दोष, व्यथा निर्मूलनाचे काम तो करतो. केवळ विचार सोईस्कर नाही, म्हणून उद्घाटकाला नाकारणे ही अतिशय मोठी शोकांतिका आहे, असेही वसंत पुरके यांनी सांगितले. सहभागी होणाऱ्यांसाठीसुद्धा ही घटना लांच्छनास्पद आहे. संमेलनात सहभागी होण्याबाबत मी स्वत:सुद्धा विचारात असल्याचे पुरके यांनी सांगितले. मात्र यासाठी चूप बसणेही चांगले नाही. उधळून टाकण्याची भाषा करणाºयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते. लोकशाहीत विचार स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. मात्र येथे विचारांचा खून केला जात आहे, असाही आरोप पुरके यांनी केला.तावडेंनी विद्यार्थ्यांचे ऐकावेचअमरावती येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मोफत शिक्षणाची मागणी करणाºया विद्यार्थ्याला तावडेंनी थेट कारागृहात डांबण्याचे आदेश दिले. मुळात मंत्री म्हणून सर्वांच्या मागण्यांचा व सूचनांचा आदर करणे अपेक्षित आहे. तावडेंना त्या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेऊन समजूत काढता आली असती. मात्र तावडेंचा तोल गेल्याची टीका माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केली.ख्यातनाम लेखिकेच्या गळचेपीचा निषेध-अराठेनिमंत्रण रद्द केल्याच्या प्रकाराचा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष माधुरी अराठे यांनीही जाहीर निषेध केला. जागतिक दर्जाच्या ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल संमेलनाच्या व्यासपीठावरून सरकारच्या दडपशाहीविरोधात आसूड ओढतील, या भीतीतून त्यांची गळचेपी राज्यकर्त्यांनी केली. पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून महिलांना संधी मिळाली. त्यातही साहित्य महामंडळाने थेट महिला उद्घाटकाचा अपमान केला. साहित्य महामंडळ सरकारच्या दडपणात काम करत आहे. संविधानिक अधिकारावर बंदी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचे अराठे यांनी सांगितले.पत्रपरिषदेत ‘लोकमत’ची मंथन पुरवणीसाहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे विचार सत्ताधाºयांना रूचणारे नसल्याचे सांगत ‘लोकमत’ची ‘मंथन’ पुरवणी दाखवून वसंत पुरके यांनी आपला संताप पत्रकार परिषदेत व्यक्त केला. हे लग्न राज्यकर्त्यांनीच मोडले. विचारांची गळचेपी, खून करणे ही निषधार्ह बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.