शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:29 IST

हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू होणार आहे.

ठळक मुद्देजन्मगावातून जयंतीदिनी प्रारंभ : कोट्यवधी स्वाक्षऱ्या घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू होणार आहे.याबाबत शनिवारी यवतमाळात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांनी तातडीने बैठक घेऊन या मोहिमेची आखणी केली. ‘हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक भारतरत्न पुरस्कार अभियान समिती’ स्थापन करण्यात आली. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात ही सर्वसमावेशक समिती पोहोचून प्रत्येक गावातून स्वाक्षºया गोळा करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.माजी खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी ‘फसव्या कर्जमाफीचा पंचनामा’ आंदोलनात वसंतराव नाईकांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली होती. तोच धागा धरून शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वामनराव कासावार यांच्यासह आमदार हरिभाऊ राठोड, डॉ. टी. सी. राठोड, माजी आमदार विजयाताई धोटे, डॉ. रमाकांत कोलते, देवानंद पवार, माधव सरकुंडे, अ‍ॅड. मिनाज मलनस, अ‍ॅड. जयसिंह चौहान, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, मनिष पाटील, ्नराजेंद्र हेंडवे, जयानंद खडसे, हरिश राठोड, हेमंत कांबळे, धनंजय मानकर, बाबूसिंग कडेल, वसंत जाधव, हरिविजय राठोड, अ‍ॅड. आर. एच. घरडे आदी उपस्थित होते.या मोहिमेत सर्वपक्षीय आजी, माजी आमदार, खासदार, मंत्री यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. गहुली ते दिल्ली अशी ही मोहीम ५ डिसेंबरला संपवून कोट्यवधी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाकडून स्वाक्षरी घेण्यासाठी माजी खासदार नाना पटोले संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Vasantrao Naikवसंतराव नाईक