शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावला सत्तांतरातही कॅबिनेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:51 IST

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला.

ठळक मुद्देसमर्थकांमध्ये जल्लोष : अशोक उईके यांचा प्रवास नगर परिषद उपाध्यक्ष ते राज्याचे मंत्री

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला.राळेगाव मतदारसंघातून प्रा.डॉ. अशोक उईके यांनी पहिल्यांदा २००४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना ५३ हजार ४६८ मते मिळाली. प्रा.पुरके यांच्याकडून त्यांचा १० हजार ८५९ मतांनी पराभव झाला होता. २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यावेळी त्यांच्या मतांचा टक्का घसरला. अशाही परिस्थितीत त्यांनी हार न मानता लोकांशी सतत संपर्क ठेवला. यानंतर २०१४ ची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढली. यात त्यांनी ४० हजारांच्यावर मताधिक्य घेऊन १५ वर्षांपासून मंत्रीपद भूषविलेल्या प्रा.पुरके यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना राळेगाव मतदारसंघात ३० हजारांच्या आसपास आघाडी मिळाली, हे विशेष.डॉ.अशोक उईके हे १९९७ ते २००१ पर्यंत बुलडाणा नगरपरिषदेचे सदस्य होते. या नगरपरिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ते वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आहे. अनूसूचित जाती-जमाती समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. मतदार संघातील देवधरी येथे बिरसा मुंडा सहकारी सूतगिरणीची स्थापना त्यांनी केली. यामाध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राळेगाव, कळंब, बाभूळगाव येथे त्यांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत आपल्या कार्याची छाप सोडली.लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ.अशोक उईके यांचे प्रामाणिक प्रयत्न राहिले. त्यांना मिळालेल्या मंत्रीपदामुळे मतदार संघातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा जनतेला आहे. डॉ.अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कळंब, राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पेढे वाढून आनंद व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Ashok Uikeअशोक उइके