शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदाचे चेहरे ‘चेंज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या पाचही जागा कायम राहिल्या. या निवडणुकीपूर्वी प्राचार्य डॉ.अशोक उईके, मदन येरावार, संजय राठोड हे तीन मंत्री होते. नव्या मंत्रिमंडळात भाजप-सेनेचे सरकार बसेल, असे गृहीत धरून राठोड व येरावार या राज्यमंत्र्यांनी कॅबिनेटसाठी मोर्चेबांधणी चालविली होती. तर उईकेंनी आपल्याकडील आदिवासी विकास हे मंत्रिपद कायम राहावे, यासाठी प्रयत्न केले होते.

ठळक मुद्देसत्ता बदल : संजय राठोड निश्चित, इंद्रनील नाईकांनाही संधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील सत्तेचे समीकरण बदलताच जिल्ह्यात मंत्रिपदाचे संभाव्य चेहरेही बदलण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजप-शिवसेनाऐवजी आता शिवसेना-राष्ट्रवादी असे नवे समीकरण जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातून शिवसेनेच्या संजय राठोड यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईकांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता बळावली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या पाचही जागा कायम राहिल्या. या निवडणुकीपूर्वी प्राचार्य डॉ.अशोक उईके, मदन येरावार, संजय राठोड हे तीन मंत्री होते. नव्या मंत्रिमंडळात भाजप-सेनेचे सरकार बसेल, असे गृहीत धरून राठोड व येरावार या राज्यमंत्र्यांनी कॅबिनेटसाठी मोर्चेबांधणी चालविली होती. तर उईकेंनी आपल्याकडील आदिवासी विकास हे मंत्रिपद कायम राहावे, यासाठी प्रयत्न केले होते. परंतु राज्यात सत्तेचे चक्र फिरले आणि सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. राज्यात आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण जुळण्याची चिन्हे आहेत. त्यांना काँग्रेस पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या घडामोडीत शिवसेनेला १४५ आमदारांच्या समर्थनाचे पत्र वेळेत राज्यपालांकडे सादर करता आले नाही. त्यांची वेळ संपली असली तरी राज्यपालांनी आता राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. त्यामुळे आता पुढे हे ठरलेले समीकरण अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.नव्या समीकरणात शिवसेनेचे संजय राठोड यांचे मंत्रिपद पक्के आहे. उलट त्यांना कॅबिनेटपदावर बढती मिळण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यातून विधान परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग, पुसदमधील नाईक बंगल्याचे नव्या पिढीचे वारसदार व पहिल्यांदाच निवडून आलेले इंद्रनील मनोहरराव नाईक ही दोन नावे प्रामुख्याने पुढे आहेत. ख्वाजा बेग यांचा आमदारकीचा अवघा वर्षभराचा कार्यकाळ शिल्लक असल्याने त्यांना मंत्रिपदावर संधी दिली जाईल की नाही, याबाबत राजकीय गोटात साशंकता आहे. परंतु इंद्रनील नाईक यांना मात्र नवा चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातून मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रा.तानाजी सावंत यांचा विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळशी आता तेवढा संबंध राहिला नसला तरी नव्या सरकारमध्ये त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असल्याने ते सत्तेचे ‘लाभार्थी’ होणार नाही. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. मात्र एकाने अलिकडेच सेनेशी घरठाव केल्याने त्यांची काँग्रेसकडून संधी तशीही हुकल्याचे मानले जाते.जिल्हा परिषदेतही सत्तेचे समीकरण बदलणार ?जिल्हा परिषदेमध्ये सध्या काँग्रेस - शिवसेना व भाजप असे सत्तेचे समीकरण आहे. नव्या टर्ममध्ये भाजपला बाहेर ठेवून काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेचे गणित मांडणार काय, याकडे नजरा लागल्या आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना सत्तेत आहे. राज्यातील बदललेले समीकरण पाहता जिल्ह्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा भाजपला विरोधी बाकावर बसविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण जुळविले जाईल का, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.यवतमाळ पॅटर्न राज्यातयवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २० जागा मिळूनही भाजप-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अभद्र खेळीमुळे दोन वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले होते. सहा महिन्यांपूर्वी ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजप-सेना व काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण मांडले गेले. हाच पॅटर्न राज्यात विधानसभेसाठी पाहायला मिळाला. भाजपने सर्वाधिक १०५ जागा मिळवूनही शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या खेळीमुळे भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण