शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सीएए कायद्यामुळे गरिबांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे.

ठळक मुद्देअब्दूर रहेमान : आर्णी येथे मार्गदर्शन, शाहीन बाग धर्तीवरील आंदोलनाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सीएए आणि एनआरसीसारख्या कायद्यांमुळे देशातील गरीब वर्गांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याविरुद्ध सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलनाचे आता धगधगत्या विचारधारेत रूपांतर झाले आहे. त्यामुळे या कायद्याबद्दल फेरविचार करण्याची वेळ आल्याचे मत माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले.आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे. हे सर्व नागरिक आता नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता धडपड करीत आहेत. यात त्यांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे, माजी राष्ट्रपती, कारगिल युद्धात लढलेले सैनिक, आसामचे मुख्यमंत्री, चंद्रयान-२ चे मुख्य सल्लागार अशा अनेकांच्या कुटुंबियांचा वगळण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयांना नागरिकत्व सिद्ध करताना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.या कायद्यामुळे वेळीच सजग होवून दिल्लीत १२ महिलांनी शाहीन बाग येथे धरणे आंदोलन सुरू केले. ते आंदोलन आता देशभर पसरले आहे. ती एक विचारधारा म्हणून देशात रूजत आहे. त्यामुळे सरकारने वेळीच या कायद्यांचा फेरविचार करावा, असे आवाहन अब्दूर रहेमान यांनी केले.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी