शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

सीएए कायद्यामुळे गरिबांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे.

ठळक मुद्देअब्दूर रहेमान : आर्णी येथे मार्गदर्शन, शाहीन बाग धर्तीवरील आंदोलनाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सीएए आणि एनआरसीसारख्या कायद्यांमुळे देशातील गरीब वर्गांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याविरुद्ध सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलनाचे आता धगधगत्या विचारधारेत रूपांतर झाले आहे. त्यामुळे या कायद्याबद्दल फेरविचार करण्याची वेळ आल्याचे मत माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले.आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे. हे सर्व नागरिक आता नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता धडपड करीत आहेत. यात त्यांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे, माजी राष्ट्रपती, कारगिल युद्धात लढलेले सैनिक, आसामचे मुख्यमंत्री, चंद्रयान-२ चे मुख्य सल्लागार अशा अनेकांच्या कुटुंबियांचा वगळण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयांना नागरिकत्व सिद्ध करताना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.या कायद्यामुळे वेळीच सजग होवून दिल्लीत १२ महिलांनी शाहीन बाग येथे धरणे आंदोलन सुरू केले. ते आंदोलन आता देशभर पसरले आहे. ती एक विचारधारा म्हणून देशात रूजत आहे. त्यामुळे सरकारने वेळीच या कायद्यांचा फेरविचार करावा, असे आवाहन अब्दूर रहेमान यांनी केले.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी