शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेविरुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशासाठी सर्वांनी जागृत होण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देअब्दूर रहेमान : पुसद, दिग्रस येथे मार्गदर्शन, विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/दिग्रस : सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. मात्र एनआरसी मुसलमानांच्या विरोधात नसून ८० टक्के जनतेच्या विरोधात आहे. गरीब, शेतकरी, मजूर, आदिवासी, ओबीसी आदी समाजाला त्याचा फटका बसणार आहे, असे मत आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी पुसद व दिग्रस येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशासाठी सर्वांनी जागृत होण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मंचावर डॉ.मोहमद नदीम, मोहमद सनी, मसूद मिर्झा, इस्तियाकभाई, डॉ.अकील मेमन, सुधीर देशमुख यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.दिग्रस येथे टाऊन हॉल परिसरातील आंदोलनाला भेट दिल्यानंतर अब्दूर रहेमान यांनी केंद्रातील सरकार आपल्या अपयशाचे पाप लपविण्यासाठी देशातील जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला. ही देशाच्या ऐक्य, अखंडता, प्रगती व भविष्यासाठी अत्यंत धोक्याची आणि चिंतेची बाब असल्याचे सांगितले.शाहीन बाग आंदोलन करणाऱ्या महिलांविरुद्ध भाजप नेते खालच्या पातळीवरची भाषा वापरून महिलांचा अपमान करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार ख्वाजा बेग, डॉ.मोहमद नदीम, राजेंद्रसिंह चौहान, शंकर जाधव, लालसिंग राठोड, आसीम अली, गौतम तुपसुंदरे, पंजाब जाधव, मिर्झा अफजल बेग, हाजी शौकत मलनस, आसिफ गोंडील, फिरोज खान, इकरार शेख यांच्यासह विविध धर्मीय बांधव उपस्थित होते. संचालन एजाजोद्दीन यांनी केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.विचारधारेला विरोधमनुवादी आणि आरएसएसच्या विचारधारेला आपला विरोध असून या कायद्यांमुळे हिंदू व मुस्लिमांमध्ये वाद उभारून भाजपाला सत्ता भोगायची असल्याचे मत अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले. देशात शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. ‘संविधान बचाओ-देश बचाओ’ ही आमची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी