शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेविरुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशासाठी सर्वांनी जागृत होण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देअब्दूर रहेमान : पुसद, दिग्रस येथे मार्गदर्शन, विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/दिग्रस : सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. मात्र एनआरसी मुसलमानांच्या विरोधात नसून ८० टक्के जनतेच्या विरोधात आहे. गरीब, शेतकरी, मजूर, आदिवासी, ओबीसी आदी समाजाला त्याचा फटका बसणार आहे, असे मत आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी पुसद व दिग्रस येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशासाठी सर्वांनी जागृत होण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मंचावर डॉ.मोहमद नदीम, मोहमद सनी, मसूद मिर्झा, इस्तियाकभाई, डॉ.अकील मेमन, सुधीर देशमुख यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.दिग्रस येथे टाऊन हॉल परिसरातील आंदोलनाला भेट दिल्यानंतर अब्दूर रहेमान यांनी केंद्रातील सरकार आपल्या अपयशाचे पाप लपविण्यासाठी देशातील जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला. ही देशाच्या ऐक्य, अखंडता, प्रगती व भविष्यासाठी अत्यंत धोक्याची आणि चिंतेची बाब असल्याचे सांगितले.शाहीन बाग आंदोलन करणाऱ्या महिलांविरुद्ध भाजप नेते खालच्या पातळीवरची भाषा वापरून महिलांचा अपमान करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार ख्वाजा बेग, डॉ.मोहमद नदीम, राजेंद्रसिंह चौहान, शंकर जाधव, लालसिंग राठोड, आसीम अली, गौतम तुपसुंदरे, पंजाब जाधव, मिर्झा अफजल बेग, हाजी शौकत मलनस, आसिफ गोंडील, फिरोज खान, इकरार शेख यांच्यासह विविध धर्मीय बांधव उपस्थित होते. संचालन एजाजोद्दीन यांनी केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.विचारधारेला विरोधमनुवादी आणि आरएसएसच्या विचारधारेला आपला विरोध असून या कायद्यांमुळे हिंदू व मुस्लिमांमध्ये वाद उभारून भाजपाला सत्ता भोगायची असल्याचे मत अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले. देशात शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. ‘संविधान बचाओ-देश बचाओ’ ही आमची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी