शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेविरुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशासाठी सर्वांनी जागृत होण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देअब्दूर रहेमान : पुसद, दिग्रस येथे मार्गदर्शन, विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/दिग्रस : सीएए कायदा धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. मात्र एनआरसी मुसलमानांच्या विरोधात नसून ८० टक्के जनतेच्या विरोधात आहे. गरीब, शेतकरी, मजूर, आदिवासी, ओबीसी आदी समाजाला त्याचा फटका बसणार आहे, असे मत आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी पुसद व दिग्रस येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशासाठी सर्वांनी जागृत होण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मंचावर डॉ.मोहमद नदीम, मोहमद सनी, मसूद मिर्झा, इस्तियाकभाई, डॉ.अकील मेमन, सुधीर देशमुख यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.दिग्रस येथे टाऊन हॉल परिसरातील आंदोलनाला भेट दिल्यानंतर अब्दूर रहेमान यांनी केंद्रातील सरकार आपल्या अपयशाचे पाप लपविण्यासाठी देशातील जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला. ही देशाच्या ऐक्य, अखंडता, प्रगती व भविष्यासाठी अत्यंत धोक्याची आणि चिंतेची बाब असल्याचे सांगितले.शाहीन बाग आंदोलन करणाऱ्या महिलांविरुद्ध भाजप नेते खालच्या पातळीवरची भाषा वापरून महिलांचा अपमान करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार ख्वाजा बेग, डॉ.मोहमद नदीम, राजेंद्रसिंह चौहान, शंकर जाधव, लालसिंग राठोड, आसीम अली, गौतम तुपसुंदरे, पंजाब जाधव, मिर्झा अफजल बेग, हाजी शौकत मलनस, आसिफ गोंडील, फिरोज खान, इकरार शेख यांच्यासह विविध धर्मीय बांधव उपस्थित होते. संचालन एजाजोद्दीन यांनी केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.विचारधारेला विरोधमनुवादी आणि आरएसएसच्या विचारधारेला आपला विरोध असून या कायद्यांमुळे हिंदू व मुस्लिमांमध्ये वाद उभारून भाजपाला सत्ता भोगायची असल्याचे मत अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले. देशात शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. ‘संविधान बचाओ-देश बचाओ’ ही आमची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी