शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यवतमाळ जिल्ह्यात ८६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका; ५ जूनला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 12:31 IST

११४ प्रभागांतील १२८ जागांसाठी होणार निवडणूक, सर्वाधिक ग्रामपंचायती वणी तालुक्यात

ठळक मुद्दे९ तारखेला लागणार निकाल

यवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. ५ जून रोजी याठिकाणी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. याशिवाय जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत कार्यकाळ संपणाऱ्या २१८ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीमध्ये १२८ जागा रिक्त आहेत. या जागा विविध कारणाने रिक्त झाल्या आहेत. त्याठिकाणी विशिष्ट संवर्गातील उमेदवारासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. गुरुवारी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. १३ ते २० मे पर्यंत ८६ ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. २३ मे रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. २५ मे रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठीची वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. याच दिवशी दुपारनंतर चिन्ह वाटप होणार आहे. ५ जून रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर ६ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ९ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

८६ ग्रामपंचायतीमध्ये वणी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमध्ये १७ जागांसाठी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. याशिवाय यवतमाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये १२ जागा, बाभूळगाव तालुक्यातील सात ग्रामपंचायतीमध्ये दहा जागा, नेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीमध्ये तीन जागा, उमरखेड एक ग्रामपंचायत एक जागा, महागाव एक ग्रामपंचायत एक जागा, दिग्रस तीन ग्रामपंचायतीमध्ये चार जागा, घाटंजी सहा ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागा, आर्णी दोन ग्रामपंचायतीमध्ये सहा जागा, दारव्हा १० ग्रामपंचायतीमध्ये ११ जागा, पुसद दहा ग्रामपंचायतीमध्ये १८ जागा, कळंब चार ग्रामपंचायतीमध्ये चार जागा, राळेगाव सात ग्रामपंचायतीमध्ये ११ जागा, केळापूर आठ ग्रामपंचायतीमध्ये ११ जागा आणि झरी तालुक्यात तीन ग्रामपंचायतीमध्ये दहा जागेसाठी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. ११४ प्रभागातील १२८ जागांसाठी ही निवडणूक घेतली जात आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक