शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

चकरा मारायला लावणारी बँक आली ताळ्यावर

By admin | Updated: June 29, 2016 02:36 IST

पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणांसाठी टाळाटाळ करणारी येथील सेंट्रल बँक शिवसेनेच्या आंदोलनानंतर ताळ्यावर आली.

वर्तनात बदल : एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर आता कर्ज मंजूरआर्णी : पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणांसाठी टाळाटाळ करणारी येथील सेंट्रल बँक शिवसेनेच्या आंदोलनानंतर ताळ्यावर आली. पूर्वी कर्जासाठी स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञा लेख मागून साडेचारशे रुपये खर्च करायला लावणारी बँक आता केवळ एक रुपयाच्या रेव्ह्यीन्यू तिकिटावर कर्ज मंजूर करीत आहे.आर्णी येथील सेंट्रल बँकेत कर्ज प्रकरणासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात होता. शेतकऱ्यांना वारंवार येरझारा माराव्या लागत होत्या. बँकेत कुणी व्यवस्थित बोलायलाही तयार नव्हते. कृषी कर्ज प्रकरणात प्रत्येक फाईलसाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा लेख मागितला जात होता. त्यासाठी शेतकऱ्यांना ४५० रुपयांचा खर्च करावा लागत होता. या बाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रारी केल्या. परंतु उपयोग झाला नाही. नंतर हे शेतकरी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे व तालुका प्रमुख रवी राठोड यांच्याकडे गेले. शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल तातडीने घेतली आणि साथही दिली.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत लगेच सेंट्रल बँक गाठली. कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात, शेतकऱ्यांना त्रास दिला जातो, हे पाहल्यानंतर या लोकांनी बँकेतील बिझनेस करस्पॉन्डन्टला मारहाण केली. त्या दिवसापासून बँकेतील सिस्टीमच बदलली. आता शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा लेख न मागता कर्ज प्रकरण त्वरित मार्गी लावल्या जात आहे. एक-एक रुपयाची रेव्ह्यीन्यू तिकीट घेऊन एक लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जात आहे. बँकेत अधिकारी-कर्मचारीसुद्धा आता व्यवस्थित बोलता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी रामदास येरावार या आर्णीतील शेतकऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. मला सेंट्रल बँकेने कर्ज प्रकरणासाठी स्टॅम्पपेपर व त्यावर प्रतिज्ञा लेख आणा, असे सांगितले होते. त्यापोटी मी ४५० रुपयांचा खर्चही केला. परंतु मला कर्जासाठी चकरा माराव्या लागल्या. मारहाणीचे प्रकरण झाल्यानंतर केवळ एक रुपयाच्या रेव्ह्यीन्यू तिकिटावर कर्ज दिले. स्टॅम्प पेपरसुद्धा घेतले नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया रामदास येरावार यांनी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)