शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

चकरा मारायला लावणारी बँक आली ताळ्यावर

By admin | Updated: June 29, 2016 02:36 IST

पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणांसाठी टाळाटाळ करणारी येथील सेंट्रल बँक शिवसेनेच्या आंदोलनानंतर ताळ्यावर आली.

वर्तनात बदल : एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर आता कर्ज मंजूरआर्णी : पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणांसाठी टाळाटाळ करणारी येथील सेंट्रल बँक शिवसेनेच्या आंदोलनानंतर ताळ्यावर आली. पूर्वी कर्जासाठी स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञा लेख मागून साडेचारशे रुपये खर्च करायला लावणारी बँक आता केवळ एक रुपयाच्या रेव्ह्यीन्यू तिकिटावर कर्ज मंजूर करीत आहे.आर्णी येथील सेंट्रल बँकेत कर्ज प्रकरणासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात होता. शेतकऱ्यांना वारंवार येरझारा माराव्या लागत होत्या. बँकेत कुणी व्यवस्थित बोलायलाही तयार नव्हते. कृषी कर्ज प्रकरणात प्रत्येक फाईलसाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा लेख मागितला जात होता. त्यासाठी शेतकऱ्यांना ४५० रुपयांचा खर्च करावा लागत होता. या बाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रारी केल्या. परंतु उपयोग झाला नाही. नंतर हे शेतकरी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे व तालुका प्रमुख रवी राठोड यांच्याकडे गेले. शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल तातडीने घेतली आणि साथही दिली.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत लगेच सेंट्रल बँक गाठली. कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात, शेतकऱ्यांना त्रास दिला जातो, हे पाहल्यानंतर या लोकांनी बँकेतील बिझनेस करस्पॉन्डन्टला मारहाण केली. त्या दिवसापासून बँकेतील सिस्टीमच बदलली. आता शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा लेख न मागता कर्ज प्रकरण त्वरित मार्गी लावल्या जात आहे. एक-एक रुपयाची रेव्ह्यीन्यू तिकीट घेऊन एक लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जात आहे. बँकेत अधिकारी-कर्मचारीसुद्धा आता व्यवस्थित बोलता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी रामदास येरावार या आर्णीतील शेतकऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. मला सेंट्रल बँकेने कर्ज प्रकरणासाठी स्टॅम्पपेपर व त्यावर प्रतिज्ञा लेख आणा, असे सांगितले होते. त्यापोटी मी ४५० रुपयांचा खर्चही केला. परंतु मला कर्जासाठी चकरा माराव्या लागल्या. मारहाणीचे प्रकरण झाल्यानंतर केवळ एक रुपयाच्या रेव्ह्यीन्यू तिकिटावर कर्ज दिले. स्टॅम्प पेपरसुद्धा घेतले नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया रामदास येरावार यांनी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)