शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: November 9, 2014 22:35 IST

यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या

शिवानंद लोहिया - हिवरीयवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला. चोरीतील एक मोटरपंप, ७० पाईप ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. डोमा चव्हाण ऊर्फ महाराज रा.भांबराजा असे संशयिताचे नाव आहे. तर मोहन दगडू राठोड रा.भांबराजा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव आहे. गेल्या वर्षभऱ्यात हिवरीसह लगतच्या गावांमधील शेतातून शेकडो मोटरपंप, पाईप, केबल आणि इतर शेती साहित्य चोरीस गेले. उगाच पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून यातील बहुतांश घटनांची तक्रारच शेतकऱ्यांनी पोलिसात दिलेली नाही. यातच सुभाष भिकमचंद लोहिया रा.हिवरी यांच्या शेतातील मोटरपंप सुमारे पंधरा दिवसांपूर्वी चोरीस गेला. गावातील अथवा लगतच्या परिसरातील चोरट्यानेच हा मोटरपंप लंपास केला असावा, असा संशय त्यांना होता. अनिल गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन चोरीस गेल्यानंतर दोघेही चोरट्याच्या मागावर होते. त्यातच अशोक मनवर यांच्या भांब येथील शेतात चोरीतील सोयाबीन आढळून आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच शेतकरी लोहिया तेथे पोहोचले. यावेळी त्यांनीही शेताची बारकाईने पाहणी केली. त्यात विहिरीतील मोटरपंप आपलेच असल्याची ओळख त्यांनी पटविली. शिवाय काही शेतकऱ्यांनी सुमारे ७० पाईपची ओळख पटविली. दरम्यान, अशोक मनवर यांना शेतात पाचारण करण्यात आले. तेव्हा त्यांनी हे शेत तीन वर्षासाठी डोमा चव्हाण ऊर्फ महाराज याला मक्त्याने दिले असल्याचे सांगितले. त्याचीच ही मोटार आणि पाईप असल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यावरून शेतकऱ्यांनी चोरीतील मोटर, पाईप आणि नोझल असे शेती साहित्य ताब्यात घेऊन यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. यावेळी ग्रामीण ठाणेदारांनी मात्र चोरीतील हे साहित्य ठाण्यात का आणले, असा प्रश्न उपस्थित करून चोरीचा छडा लावणाऱ्या शेतकऱ्यांवरच आगपाखड केली. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. वास्तविक शेतकरी अथवा नागरिकांनी अशी गंभीर घटना उघडकीस आणल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी. मात्र या प्रकाराने गुन्हेगारी नियंत्रणात कोण मदत करेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.