शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: November 9, 2014 22:35 IST

यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या

शिवानंद लोहिया - हिवरीयवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला. चोरीतील एक मोटरपंप, ७० पाईप ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. डोमा चव्हाण ऊर्फ महाराज रा.भांबराजा असे संशयिताचे नाव आहे. तर मोहन दगडू राठोड रा.भांबराजा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव आहे. गेल्या वर्षभऱ्यात हिवरीसह लगतच्या गावांमधील शेतातून शेकडो मोटरपंप, पाईप, केबल आणि इतर शेती साहित्य चोरीस गेले. उगाच पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून यातील बहुतांश घटनांची तक्रारच शेतकऱ्यांनी पोलिसात दिलेली नाही. यातच सुभाष भिकमचंद लोहिया रा.हिवरी यांच्या शेतातील मोटरपंप सुमारे पंधरा दिवसांपूर्वी चोरीस गेला. गावातील अथवा लगतच्या परिसरातील चोरट्यानेच हा मोटरपंप लंपास केला असावा, असा संशय त्यांना होता. अनिल गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन चोरीस गेल्यानंतर दोघेही चोरट्याच्या मागावर होते. त्यातच अशोक मनवर यांच्या भांब येथील शेतात चोरीतील सोयाबीन आढळून आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच शेतकरी लोहिया तेथे पोहोचले. यावेळी त्यांनीही शेताची बारकाईने पाहणी केली. त्यात विहिरीतील मोटरपंप आपलेच असल्याची ओळख त्यांनी पटविली. शिवाय काही शेतकऱ्यांनी सुमारे ७० पाईपची ओळख पटविली. दरम्यान, अशोक मनवर यांना शेतात पाचारण करण्यात आले. तेव्हा त्यांनी हे शेत तीन वर्षासाठी डोमा चव्हाण ऊर्फ महाराज याला मक्त्याने दिले असल्याचे सांगितले. त्याचीच ही मोटार आणि पाईप असल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यावरून शेतकऱ्यांनी चोरीतील मोटर, पाईप आणि नोझल असे शेती साहित्य ताब्यात घेऊन यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. यावेळी ग्रामीण ठाणेदारांनी मात्र चोरीतील हे साहित्य ठाण्यात का आणले, असा प्रश्न उपस्थित करून चोरीचा छडा लावणाऱ्या शेतकऱ्यांवरच आगपाखड केली. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. वास्तविक शेतकरी अथवा नागरिकांनी अशी गंभीर घटना उघडकीस आणल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी. मात्र या प्रकाराने गुन्हेगारी नियंत्रणात कोण मदत करेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.