शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

विनाप्रवासी धावतात बस; किलोमीटरचा अट्टाहास, महामंडळाला फटका 

By विलास गावंडे | Updated: January 12, 2024 22:13 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून ७५ वर्षे वयावरील नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास आहे.

यवतमाळ : एकीकडे एसटी बस खचाखच भरून जात असताना, दुसरीकडे एकही प्रवासी नसलेल्या बसेस धावत असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. प्रवासी मिळत नसताना केवळ किलोमीटर पूर्ण करण्याच्या अट्टाहासापोटी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहेत. काही ठिकाणी फेऱ्या सोडण्यात नियोजनाचा अभावही दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून ७५ वर्षे वयावरील नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास आहे. ६५ वर्षांवरील नागरिक आणि महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत मिळाली आहे. शिवाय इतरही काही घटकाला काही प्रमाणात प्रवासात सवलत दिली जाते. यामुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जागा मिळत नसल्याने पुरुषच नव्हे, तर महिलांमध्येही भांडण होण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. सर्वत्र हे चित्र असताना काही ठिकाणी मात्र एकही प्रवासी न घेता बस धावतात.

सवलतीच्या माध्यमातून एसटीच्या उत्पन्नाची बाजू काही प्रमाणात सावरली जात असताना फेऱ्यांच्या नियोजनात ठेवल्या जात असलेल्या दोषामुळे या प्रयत्नावर पाणी फेरले जात आहे. किलोमीटर वाढविण्यासाठी वरिष्ठांचा हेका, वाहतूक नियंत्रकांकडून होत नसलेले फेऱ्यांचे योग्य नियोजन, यामुळे यात दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येते. ज्या मार्गावर प्रवासी मिळत नाही, तेथे लागोपाठ तीन ते चार फेऱ्या सोडल्या जातात. यातील काही फेऱ्या नेमके दोन-चार प्रवासी घेऊन तर काही एकही प्रवासी न घेता मार्गस्थ होतात. प्रामुख्याने विभाग नियंत्रकांचे नसलेले नियंत्रण यामुळे एसटीच्या उत्पन्नात सातत्याने घट होत असल्याची ओरड आहे. आपण किलोमीटरचे टार्गेट पूर्ण केल्याचे वरिष्ठांना दाखविण्यासाठीही हा प्रयोग होत असल्याची चर्चा खुद्द महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

चालक-वाहकांना सक्ती नकोकेवळ किलोमीटर रद्द होऊ नये म्हणून फेऱ्या पूर्ण करण्यासाठी चालक-वाहकांवर सक्ती करू नये, असे महामंडळाचे परिपत्रक आहे. परिस्थितीचे अवलोकन करूनच बसफेऱ्यांचे नियोजन करणे महामंडळाला अपेक्षित आहे. स्थानकावर प्रवासी उपलब्ध नाही, असे चित्र असतानाही बसफेऱ्या सोडल्या जात असल्याचा महामंडळातीलच अनेकांचा अनुभव आहे.

तब्बल १४ दिवस धावली विनाप्रवासी बसमाहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये यवतमाळ आगारातील एक फेरी तब्बल १४ दिवस विनाप्रवासी धावली. घाटंजीहून रात्री ८ वाजता सुटणारी ही बसफेरी होती. यवतमाळहून सायंकाळी ७ वाजता ही बस सोडली जात होती. २६ दिवसांत यवतमाळातून केवळ ३८५ प्रवासी घेऊन जात अवघे १३ हजार ४८३ रुपये कमाई या फेरीने दिली. घाटंजी येथून रात्री ८ वाजता परतताना २६ दिवसांत या फेरीने केवळ ५८ प्रवासी आणले. उत्पन्न अवघे १६०० रुपये मिळाले. असाच प्रकार याच मार्गावर सायंकाळी ६.१५ वाजता जाणाऱ्या व रात्री ७.३० वाजता परत येणाऱ्या, ६.३० वाजता सुटणाऱ्या आणि ७.५० वाजता परत येणाऱ्या बसच्या बाबतीतही घडला आहे.

टॅग्स :state transportएसटीYavatmalयवतमाळ