शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दुष्काळाने बैलबाजार पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:37 IST

दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.

ठळक मुद्देभाव अर्ध्यावर : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी आले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शेतकऱ्यांऐवजी थेट मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारीच यवतमाळात येऊन चक्क अर्ध्या किमतीत बैलजोड्या विकत घेत आहेत.खरीप हंगाम संपल्यावरही शेतकऱ्यांच्या हाती पैसे आले नाही. शेतकऱ्यांनी उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करण्यासाठी खासगी सावकारांनी तगादा लावला. यातून सुटका व्हावी म्हणून शेतकºयांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीला आली आहे. त्या तुलनेत खरेदी करणारे मात्र बाजारात नाही. यामुळे बैलबाजार कोसळला आहे.बैलांची खरेदी करणारे व्यापारी आणि दलालच बाजारात दिसत आहे. ही मंडळी बैलाची अत्यल्प दरात मागणी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील व्यापारी जिल्ह्यात येऊन बैलांची खरेदी करताना दिसत आहे. अडत्यामार्फत खरेदी केली जात आहे. बाजारात दर पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. ५० ते ६० हजार रूपयापर्यंत असलेली बैलजोडी ३० ते ३५ हजारापर्यंत मागितली जात आहे. यामुळे शेतकरी या बाजारातून दुसऱ्या बाजारात आणि तेथून आणखी तिसऱ्या बाजारात बैल घेऊन पायपीट करीत आहे. मात्र कुठेही भाव मिळत नाही.२०० पैकी १७० बैलजोड्या परतबैलबाजारात भाव नसल्याने शेतकरी बैल न विकता परत नेणेच पंसत करीत आहे. दुसऱ्या बाजाराकडे मोर्चा वळवत आहे. रविवारी यवतमाळच्या बैलबाजारात २०० जोड्यांपैकी केवळ ३० जोड्यांचीच विक्री झाली. त्याचा सर्वाधिक दर ३५ हजार रूपये राहिला. अपेक्षेपेक्षा हे दर निम्मे होते. शेतकऱ्यांना बैलजोडी ने-आण करण्याचाच मोठा खर्च करावा लागला.शेतकरी म्हणतात, पर्यायच नाहीउधारी, उसनवारी, सावकाराचे पैसे या साऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैलजोडी विक्रीचा निर्णय घेतला. पण आता पुढच्या वर्षी पाहू. यंदा भावच नाही.- अशोक मेश्राम, वाढोणा बाजारबैलजोडीला एक लाख रूपयाचा भाव ठेवला. बाजारात इतकी सुपर जोडी शोधून सापडत नाही. पण ५० हजारांच्या आताच मागत आहे. मी बैलजोडी न विकताच परत जाणार आहे. अडचणीत व्यापारी पाडून भाव मागत आहेत. - महादेव सोळंके, कळंबबैलजोडीला भाव नसले तरी दुधाळ जनावरांच्या किमती चांगल्या आहे. त्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. दुष्काळी स्थितीने बाजारात चढउतार होत आहे. मात्र पर्याय नसल्याने जनावरे विकावीच लागत आहे. - दत्ता पजगाडे, चाणी

टॅग्स :Marketबाजार