शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पांढरकवडात अतिक्रमणावर बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:45 IST

शहरातील वर्दळीच्या ठिकाणावर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे. एस.टी.बसस्थानकाच्या बाजुने जाणाऱ्या स्टेडियमवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली अवैध अतिक्रमणे बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात आली आहे.

ठळक मुद्देपालिकेची धडक मोहीम : पोलीस बंदोबस्तात हटविले अवैध बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरातील वर्दळीच्या ठिकाणावर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे.एस.टी.बसस्थानकाच्या बाजुने जाणाऱ्या स्टेडियमवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली अवैध अतिक्रमणे बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात आली आहे. स्टेडियम रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या रस्त्याने नेहमीच वाहतूूक सुरू असते. आखाडा परिसरात बेतवार ले-आऊट, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, मुलींचे शासकीय वसतिगृह व शाळा महाविद्यालयाकडे जाणारे विद्यार्थी, नागरिक जाण्यायेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याच्या मध्यभागी विजेचे खांब असल्यामुळे हा रस्ता अगोदरच अरूंद झाला आहे. त्यातल्या त्यातच या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी तर अवैध अतिक्रमण केले होते. काहींनी तेथे दुकानेसुद्धा थाटली होती. तसेच काही व्यावसायिकांनी तर दोन-तीन ठिकाणी टपºया टाकून आपली जागा आरक्षित केली होती. ही जागा दुसºयाला ३० ते ४० हजार रूपये महिन्याने किरायाने दिली होती. अतिक्रमण करून जागा बळकावण्याची व ती दुसºयाला भाड्याने द्यायची, हा प्रकार अतिक्रमण हटविताना उघडकीस आला. या रस्त्यावरील संपूर्ण अवैध अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे हा रस्ता आता रहदारीस मोकळा झाला आहे. त्यानंतर बसवेश्वर चौकापासून जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील व्यापार संकुलासमोर असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. बचत भवनासमोर मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमणे करण्यात आली होती. या अतिक्रमणामुळे बचत भवन परिसरात असलेल्या महात्मा गांधींचा पुतळाच दिसेनासा झाला होता. अतिक्रमणामुळे हा पुतळा पूर्णपणे झाकून गेला होता. पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटविल्यामुळे ही जागा पूर्णपणे मोकळी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.व्यावसायिकांकडून सहकार्याची अपेक्षाशासनाच्या आदेशानुसार शहरातील अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू असून रस्त्यावर किंवा फुटपाथवर अतिक्रमण केलेल्यांचीच दुकाने हटविण्यात येणार आहे. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी आहे व रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आले आहे, अशी अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी केले आहे.