शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

बैलबाजारावर संक्रांत

By admin | Updated: January 4, 2016 04:40 IST

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे

दुष्काळाने दर पडले : महिना लोटला तरी ग्राहक मिळेनारूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळदुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. गोवंश हत्याबंदीसह दुष्काळाने बाजारात बैलाचे दर पडले आहेत. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून म्हशी विक्रीला काढल्या आहेत. परिणामी बाजारात बैलाच्या जागेवर म्हशी दिसत आहेत. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळाने शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे. खासगी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावर मोठ्या प्रमाणात विक्रीला काढले आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याने बैलांचा बाजारच गारद झाला आहे. गाय अथवा बैलांना खरेदी करताच खरेदीदारांवर कायदेशीर बंधने येऊन पडली आहेत. या प्रकरणात पोलीस कारवाई होत आहे. यामुळे या व्यवसायातून व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. मोजकेच व्यापारी व्यवसायात शिल्लक राहीले आहेत. यातून बैलबाजार पूर्णत: गारद झाला आहे. बैल आणि गाय खरेदी करण्यासाठी व्यापारी नाहीत. तर ज्या शेतकऱ्यांना ते खरेदी करायचे आहेत, त्यांच्याजवळ पैसा नाही. यामुळे बाजारात बैलाचे दर पडले आहेत. तर गाय खरेदी करणे व्यापाऱ्यांनी बंद केल्याने बाजारात गाय विक्रीला येत नाही. बैल विक्रीला येतात, मात्र त्याला व्यापारी खरेदी करीत नाही. शेतकरी घेत नाही. यामुळे महिनाभरापासून शेतकऱ्यांना के वळ बैलबाजाराच्या येरझारा माराव्या लागत आहे.बैल नव्हे म्हैस बाजारबैल आणि गाय खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही. मात्र म्हैस खरेदी होत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे म्हशी आहेत, त्यांनी बैलांऐवजी म्हशी विक्रीसाठी आणल्या आहेत. यामुळे बैलबाजारात बैल नावालाच आणि म्हशी अफाट, असे चित्र आहे.प्रतिक्रियादुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. बाजारात दर मिळायला तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या दरात जनावर विकावे लागत आहेत.- अब्दुल रहीम, शेतकरी, आर्वीअलीकडे मजुरीचे दर वाढले. वर्षभर जनावर सांभाळणे अवघड आहे. दुसऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. म्हणून बैल विकायला काढले. पावसाळ्यात कमी पैशात दुसरी जोडी घेण्याचा विचार आहे. - विजय कार, शेतकरी, यवतमाळगत महिनाभरापासून बैल विक्रीसाठी काढले आहेत. मात्र त्याला ग्राहक भेटले नाही. पडलेल्या दरात बैल मागितले जात आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. - मुकेश ढुमणे, शेतकरी, घारफळसोयाबीन डुबले, दुसरे पीक राहीले नाही. यामुळे कर्ज फेडण्यासाठी बैल विकावे लागत आहे. नुसत्या शेतीवर भागत नाही. यामुळे सारेच शेतकरी चिंतेत आहेत- बाबाराव राठोड, शेतकरी, धामणीयवतमाळच नव्हेतर देवगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, दारव्हा आणि दिग्रस या ठिकाणच्या बैलबाजाराची स्थिती अशीच आहे. - महंमद नासिर, व्यापारी