शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

बैलबाजारावर संक्रांत

By admin | Updated: January 4, 2016 04:40 IST

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे

दुष्काळाने दर पडले : महिना लोटला तरी ग्राहक मिळेनारूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळदुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. गोवंश हत्याबंदीसह दुष्काळाने बाजारात बैलाचे दर पडले आहेत. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून म्हशी विक्रीला काढल्या आहेत. परिणामी बाजारात बैलाच्या जागेवर म्हशी दिसत आहेत. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळाने शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे. खासगी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावर मोठ्या प्रमाणात विक्रीला काढले आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याने बैलांचा बाजारच गारद झाला आहे. गाय अथवा बैलांना खरेदी करताच खरेदीदारांवर कायदेशीर बंधने येऊन पडली आहेत. या प्रकरणात पोलीस कारवाई होत आहे. यामुळे या व्यवसायातून व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. मोजकेच व्यापारी व्यवसायात शिल्लक राहीले आहेत. यातून बैलबाजार पूर्णत: गारद झाला आहे. बैल आणि गाय खरेदी करण्यासाठी व्यापारी नाहीत. तर ज्या शेतकऱ्यांना ते खरेदी करायचे आहेत, त्यांच्याजवळ पैसा नाही. यामुळे बाजारात बैलाचे दर पडले आहेत. तर गाय खरेदी करणे व्यापाऱ्यांनी बंद केल्याने बाजारात गाय विक्रीला येत नाही. बैल विक्रीला येतात, मात्र त्याला व्यापारी खरेदी करीत नाही. शेतकरी घेत नाही. यामुळे महिनाभरापासून शेतकऱ्यांना के वळ बैलबाजाराच्या येरझारा माराव्या लागत आहे.बैल नव्हे म्हैस बाजारबैल आणि गाय खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही. मात्र म्हैस खरेदी होत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे म्हशी आहेत, त्यांनी बैलांऐवजी म्हशी विक्रीसाठी आणल्या आहेत. यामुळे बैलबाजारात बैल नावालाच आणि म्हशी अफाट, असे चित्र आहे.प्रतिक्रियादुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. बाजारात दर मिळायला तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या दरात जनावर विकावे लागत आहेत.- अब्दुल रहीम, शेतकरी, आर्वीअलीकडे मजुरीचे दर वाढले. वर्षभर जनावर सांभाळणे अवघड आहे. दुसऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. म्हणून बैल विकायला काढले. पावसाळ्यात कमी पैशात दुसरी जोडी घेण्याचा विचार आहे. - विजय कार, शेतकरी, यवतमाळगत महिनाभरापासून बैल विक्रीसाठी काढले आहेत. मात्र त्याला ग्राहक भेटले नाही. पडलेल्या दरात बैल मागितले जात आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. - मुकेश ढुमणे, शेतकरी, घारफळसोयाबीन डुबले, दुसरे पीक राहीले नाही. यामुळे कर्ज फेडण्यासाठी बैल विकावे लागत आहे. नुसत्या शेतीवर भागत नाही. यामुळे सारेच शेतकरी चिंतेत आहेत- बाबाराव राठोड, शेतकरी, धामणीयवतमाळच नव्हेतर देवगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, दारव्हा आणि दिग्रस या ठिकाणच्या बैलबाजाराची स्थिती अशीच आहे. - महंमद नासिर, व्यापारी