शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

बैलबाजारावर संक्रांत

By admin | Updated: January 4, 2016 04:40 IST

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे

दुष्काळाने दर पडले : महिना लोटला तरी ग्राहक मिळेनारूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळदुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. गोवंश हत्याबंदीसह दुष्काळाने बाजारात बैलाचे दर पडले आहेत. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून म्हशी विक्रीला काढल्या आहेत. परिणामी बाजारात बैलाच्या जागेवर म्हशी दिसत आहेत. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळाने शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे. खासगी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावर मोठ्या प्रमाणात विक्रीला काढले आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याने बैलांचा बाजारच गारद झाला आहे. गाय अथवा बैलांना खरेदी करताच खरेदीदारांवर कायदेशीर बंधने येऊन पडली आहेत. या प्रकरणात पोलीस कारवाई होत आहे. यामुळे या व्यवसायातून व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. मोजकेच व्यापारी व्यवसायात शिल्लक राहीले आहेत. यातून बैलबाजार पूर्णत: गारद झाला आहे. बैल आणि गाय खरेदी करण्यासाठी व्यापारी नाहीत. तर ज्या शेतकऱ्यांना ते खरेदी करायचे आहेत, त्यांच्याजवळ पैसा नाही. यामुळे बाजारात बैलाचे दर पडले आहेत. तर गाय खरेदी करणे व्यापाऱ्यांनी बंद केल्याने बाजारात गाय विक्रीला येत नाही. बैल विक्रीला येतात, मात्र त्याला व्यापारी खरेदी करीत नाही. शेतकरी घेत नाही. यामुळे महिनाभरापासून शेतकऱ्यांना के वळ बैलबाजाराच्या येरझारा माराव्या लागत आहे.बैल नव्हे म्हैस बाजारबैल आणि गाय खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही. मात्र म्हैस खरेदी होत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे म्हशी आहेत, त्यांनी बैलांऐवजी म्हशी विक्रीसाठी आणल्या आहेत. यामुळे बैलबाजारात बैल नावालाच आणि म्हशी अफाट, असे चित्र आहे.प्रतिक्रियादुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. बाजारात दर मिळायला तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या दरात जनावर विकावे लागत आहेत.- अब्दुल रहीम, शेतकरी, आर्वीअलीकडे मजुरीचे दर वाढले. वर्षभर जनावर सांभाळणे अवघड आहे. दुसऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. म्हणून बैल विकायला काढले. पावसाळ्यात कमी पैशात दुसरी जोडी घेण्याचा विचार आहे. - विजय कार, शेतकरी, यवतमाळगत महिनाभरापासून बैल विक्रीसाठी काढले आहेत. मात्र त्याला ग्राहक भेटले नाही. पडलेल्या दरात बैल मागितले जात आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. - मुकेश ढुमणे, शेतकरी, घारफळसोयाबीन डुबले, दुसरे पीक राहीले नाही. यामुळे कर्ज फेडण्यासाठी बैल विकावे लागत आहे. नुसत्या शेतीवर भागत नाही. यामुळे सारेच शेतकरी चिंतेत आहेत- बाबाराव राठोड, शेतकरी, धामणीयवतमाळच नव्हेतर देवगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, दारव्हा आणि दिग्रस या ठिकाणच्या बैलबाजाराची स्थिती अशीच आहे. - महंमद नासिर, व्यापारी