शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या बजेटला १५ टक्के कात्री

By admin | Updated: February 1, 2016 02:11 IST

केंद्राच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने गाजावाजा करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (एमएमजीएसवाय) सुरू केली.

कपात निधी ‘एमएमसीजीएसवाय’कडे वळविला : १९० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर यवतमाळ : केंद्राच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने गाजावाजा करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (एमएमजीएसवाय) सुरू केली. मात्र या योजनेसाठी जिल्ह्यांच्या बजेटमध्ये कपात करून तो निधी वळविला जात आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्याच्या बजेटला १५ टक्के निधीची कात्री लावण्यात आली आहे. हा निधी ‘एमएमजीएसवाय’मध्ये वापरला जाणार आहे. या निधी कपातीवरच जिल्हा नियोजन समितीची रविवारची सभा वादळी ठरली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, खासदार भावना गवळी, आमदार मनोहरराव नाईक, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, जिल्ह्याचे पालक सचिव व्ही.गिरीराज, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, नियोजन उपायुक्त वामन काळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यात सहा टक्के वाढ करण्याऐवजी १५ टक्के कपात केली जात आहे, ती करण्यात येऊ नये, असा आक्षेप आमदार माणिकराव ठाकरे यांनी घेतला. या ठरावाला विरोध दर्शविताच आराखड्यात कपात करण्यामागची भूमिका पालक सचिव व्ही.गिरीराज यांनी सभेत मांडली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी आर्थिक तरतूद केली जात आहे. त्यातून मोठा निधी जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्याच्या विकास आराखड्याला कात्री लावल्याचे त्यांनी सांगितले. यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी राज्य शासनाने स्वतंत्र तरतूद करावी, जिल्ह्याच्या विकास आराखडा निधीला कात्री लावून योजना राबविणे चुकीचे असल्याचेही सांगितले. सभेत इतिवृत्त वाचत असताना पालकमंत्र्यांनी महागाव तालुक्यातील टेंभूरधरा येथील कामांबाबत काय झाले, याची विचारणा केली. मात्र संबंधित अधिकाऱ्याकडून कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. आमदार नजरधने यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा याही सभेत निरुत्तरीतच राहिला. जलयुक्त शिवारमधील बिलो गेलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत खासदार भावना गवळी यांनी प्रश्न उपस्थित केला. दिग्रस तालुक्यातील तक्रार असून त्यावर मागील तीन महिन्यांपासून कोणतीच कारवाई झाली नाही. याची संबंधितांनी आठ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करावे असे निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीने सूचविलेली कामे घेतली जात नाही, असा आक्षेप सदस्यांनी नोंदविला. २०१६-१७ च्या प्रारुप आराखड्याच्या यादीमध्ये एकही कामांचा समावेश नाही. या आराखड्यावरच विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. यावर पालकमंत्र्यांनी कामांची यादी अंतिम नसून त्यात एप्रिल महिन्यापर्यंत सुधारणा केली जाईल. तेव्हा सर्व सदस्यांनी व यंत्रणांनी आपली कामे सूचवावी, असे सांगितले. यावर आमदार मनोहरराव नाईक यांनी आक्षेप घेऊन प्रारुप आराखडा मंजूर केल्यानंतर अंतिम यादीत समाविष्ठ केलेल्या कामांसाठी आर्थिक तरतूद कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला. वीज वितरणकडे ३४ कोटी अखर्चित असल्याचे सांगण्यात आले. यावर पंपाची जोडणी का होत नाही, असा प्रश्न आमदार येरावार यांनी उपस्थित केला. (कार्यालय प्रतिनिधी)