शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

‘बीएसएनएल’ कर्मचाऱ्यांचा संप

By admin | Updated: April 23, 2015 02:14 IST

बीएसएनएल बचाओ-राष्ट्र बचाओ’ असा नारा देत भारत संचार निगमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे.

यवतमाळ : ‘बीएसएनएल बचाओ-राष्ट्र बचाओ’ असा नारा देत भारत संचार निगमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या अंतर्गत बुधवारी येथे निदर्शने केली. बीएसएनएलच्या अस्तित्वासाठी ही लढाई असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. शासनाच्या चुकीच्या धोरणाचे बळी भारत संचार निगम करत आहे. कुशल व अनुभवी तंत्रज्ञ असतानाही सामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा मिळत नाही. भारत संचारला डावलून सरकार केवळ खासगी कंपन्यांच्या फायद्याचा विचार करत आहे. त्यांनाच नवीन सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे मत या नेत्यांनी मांडले. आवश्यक उपकरणांची खरेदी त्वरित करावी, निदेशकांची रिक्त पदे भरावी, ४-जी सेवा प्रदान करण्याचा अधिकार द्यावा, स्पेक्ट्रमचे वाटप करताना उदार धोरण ठेवून बीएसएनएलकडून लायसन्स फी माफ करावी शिवाय मागील सहा हजार ७०० कोटी रुपये परत करावे, केंद्र-राज्य तथा पीएसयूला बीएसएनएलकडून सेवा घेणे अनिवार्य करावे, बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही तोट्यातील उद्योगांचे विलिनीकरण करू नये, बीएसएनएलच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी आहे. बंदमध्ये भारत संचारचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. बंदचे नेतृत्व नॅशनल फेडरेशन टेलिकॉम एम्प्लॉईज अधिकारी संघटनेचे नरेंद्र गद्रे, जिल्हाध्यक्ष सुनील बेनोडेकर, जिल्हा सचिव शंतनू शेटे यांनी केले. (वार्ताहर)